शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कंटेनरच्या धडकेत पोलीस ठार

By admin | Updated: June 27, 2016 00:23 IST

गरवारे पॉइंट येथील घटना

नाशिक : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत शहर पोलीस वाहतूक शाखेतील कर्मचारी नाना भाऊ बागुल (५०) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटवर घडली़ या कंटेनरचालकास थांबण्याचा इशारा देऊनही त्याने भरधाव वेगात येऊन बागुल यांना धडक दिली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दखल केला असून, बागुल यांच्यावर सोमवारी (दि़२७) सकाळी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़ पोलीस आयुक्तालयातील शहर वाहतूक शाखेत पोलीस हवालदार नाना भाऊ बागुल (५०, रा. गंगा हौसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद रोड, मूळ रा. चाफ्याचा पाडा, डांगसौंदाणे, ता. सटाणा) हे कार्यरत होते़ अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे पॉइंटवर रविवारी ते नियुक्तीवर होते़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईकडून भरधाव येणाऱ्या कंटेनरला (एमएच ०४, जीसी ५८७५) थांबण्याचा इशारा केला असता कंटेनरचालकाने वेगाने उड्डाणपुलाच्या दिशेने कंटेनर नेला़ याचा जोरदार फटका बागुल यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला बसला़या अपघातात गंभीर जखमी झालेले बागुल यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)