शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्रामसाठी जागासंपादन ठरणार कळीचा मुद्दा

By admin | Updated: July 26, 2014 00:48 IST

दशरथ पाटील : साधू-महंतांसह शेतकऱ्यांनाही विश्वासात घेण्याची गरज

नाशिक : मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात ध्वज उतरेपर्यंत शासनाकडून मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा केली जात होती, यंदा तर प्रत्यक्ष कामे सुरूहोण्यापूर्वीच महापालिकेकडे २२२ कोटी रुपयांचा निधी आलेला आहे. दुर्दैवाने, नजरेत भरेल असे एकही काम दिसत नाही. मागील सिंहस्थात ५७ एकर जागा साधुग्रामसाठी कायमस्वरुपी खरेदी करण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त २८६ एकर जागा संपादित करण्यात आलेली होती. महापालिकेने आगामी कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त जागेबाबत अद्याप कुठलीही हालचाल केलेली नाही. ज्यांच्यासाठी कुंभमेळा भरविला जातो त्या साधू-महंतांना विश्वासात घेऊन जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडविला नाही तर कुंभमेळ्यात बिकट परिस्थिती ओढवण्याची भीती माजी महापौर दशरथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापालिकेचे प्रतिनिधित्व करणारे दशरथ पाटील यांनी सन २००३-०४ मध्ये झालेल्या आणि आता अवघ्या ११ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याविषयी आपली मते परखडपणे, पण अभ्यासपूर्ण मांडली. पाटील यांनी सांगितले, मागील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४५० कोटींचा विकास आराखडा होता. त्यातून महापालिकेच्या वाट्याला ६८ कोटी रुपये आले. सर्वप्रथम साधुग्रामसाठी तपोवनातील लक्ष्मीनारायण ट्रस्टची ५७ एकर जागा १४ कोटी रुपये खर्चून संपादित करण्यात आली. उर्वरित १६७ एकर जागा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात संपादित केली. याव्यतिरिक्त पांजरापोळची ४७ एकर, स्वामीनारायण ट्रस्टसमोरील ४५ एकर जागाही तात्पुरत्या स्वरूपात संपादित करण्यात आली. ३० एकर जागा वारकरी संप्रदायासाठी मिळविली. सुमारे ३२४ एकर जागा संपादित करत जागेचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला. अर्थात शेतकरी आणि साधू-महंत यांना विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडविला गेला होता. पाणीपुरवठ्याबाबत थेट पाइपलाइन योजनेच्या माध्यमातून तीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. गोदावरीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी ३५० कि.मी. भूमिगत गटारयोजना राबविण्यात आली. गोदावरी कृती योजनेच्या माध्यमातून ट्रंकसिव्हर योजना राबविली गेली. पाच मलनिस्सारण केंद्रे उभारली गेली. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. सिंहस्थात येणारी वाहतूक लक्षात घेता २२ रिंगरोडची निर्मिती करण्यात आली. गोदावरी, वालदेवी व नासर्डी या नद्यांवर एकूण २२ पूल उभारले. दोन पुलांना समांतर अशा पुलाची निर्मिती झाली. नाशिकरोडला उड्डाणपूलही उभा राहिला. शहरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी १०५ सुलभ शौचालये बांधण्यात आली. ध्वजारोहणापूर्वी तीन-चार महिने अगोदरपासूनच साधुग्राममध्ये ४५० निवाराशेड्स उभी राहिली. मोठ्या आखाड्यांसाठी मोठ्या तंबूंची सोय करण्यात आली. साधुग्राममध्ये कच्चे रस्ते तसेच पाण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महापालिकेने ही सारी कामे शासनाकडून पुरेसा निधी मिळाला नसतानाही हिंमतीवर पूर्ण केली होती. राज्यात कॉँग्रेसचे सरकार तर मी सेना-भाजपाचा महापौर अशी स्थिती असतानाही कधी संघर्ष करत, तर कधी समन्वय-समजुतीने निधी पदरात पाडून घेण्यात आला. आता महापालिकेकडे सुमारे २२२ कोटी रुपयांचा निधी आलेला आहे; परंतु नजरेत भरतील अशी कामे दिसून येत नाहीत. मागील कुंभात संपादित केलेल्या ५७ एकर जागेच्या भरवशावरच ही मंडळी बसून आहेत. अतिरिक्त जागेबाबत कसलीही हालचाल दिसून येत नाही. आगामी कुंभमेळ्यात जागेचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. जागेबाबत शेतकऱ्यांकडे बोट दाखविले जाते परंतु दहशत माजवून हा प्रश्न सुटणारा नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात या जागा संपादित केल्या जाणार असल्याचे त्यांना पटवून द्यावे लागणार आहे. साधुग्रामसाठी जागेचा प्रश्न लवकर मिटला नाही, तर मोठी बिकट स्थिती निर्माण होऊ शकते, असा धोक्याचा इशाराही पाटील यांनी दिला.साधू-महंतांना बाजूला ठेवून सिंहस्थाचे नियोजन करता येणार नाही. साधू-महंतांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांचा आदर केला गेला नाही तर कुंभमेळा कागदावरच राहील. आता जुन्याच रिंगरोडची डागडुजी करण्याची कामे सुरु आहेत; परंतु वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नवीन रस्त्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. शहराबाहेरून वाहतूक वळविणारी व्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे. आवश्यक त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांना तातडीने चालना दिली पाहिजे. १९९१ मध्ये झालेल्या सिंहस्थात महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यावेळी शासनाने ९१ कोटी रुपयांचा निधी दिला होता. २००३ च्या कुंभाला ६८ कोटी रुपये निधी आला. निधी आला नाही म्हणून रडत बसण्याऐवजी लढण्याचीच भूमिका ठेवली. साधू-महंतांसह नाशिककरांना विश्वासात घेऊन कामे होत गेल्याने त्यावेळी कुंभमेळ्याबरोबरच खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाचीही पर्वणी साधली गेल्याचे पाटील यांनी सांगितले.