शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

कोरोनाच्या वेदनांवर कवींकडून काव्यफुंकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनामुळे आधीच हळव्या झालेल्या मनांना उभारी देण्यासाठी नाशिकच्या कवींनी कवितांच्या माध्यमातून हळुवार शब्दांची फुंकर घातली. अमाप ...

नाशिक : कोरोनामुळे आधीच हळव्या झालेल्या मनांना उभारी देण्यासाठी नाशिकच्या कवींनी कवितांच्या माध्यमातून हळुवार शब्दांची फुंकर घातली. अमाप वेदना घेऊन जगणाऱ्या माणसांच्या मनाला या कवितांनी जगण्याची ऊर्मी दिली.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत आयोजकांनी दहावे पुष्प गुंफण्यासाठी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. निमित्त होते, स्व. प्रा. सुरेश मेणे यांच्या स्मृतींचे. महामारीच्या या काळात संपूर्ण लोकमानस उद्विग्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना कविता’या विषयावर कवींनी आशयघन कविता व्यक्त करून समाजाच्या भावनांना जणू वाट करून दिली. प्रा. गंगाधर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात गझलकार जयश्री वाघ यांनी ‘ही अज्ञानातून लिपी उमगते आहे, अन् काळोखाची अगम्य निर्गम भाषा’ तसेच ‘हे हात कधीचे हातातून सुटले आहे, का उगी धावती पाय घेऊनी आशा’ ही काव्ये सादर केली.

अभिनेते अजय बिरारी यांनी ‘राहू आपण सारेच दूर, नको स्पर्श, नको जवळीक’ या ओळींतून भावना व्यक्त केल्या.

शिक्षक नेते संजय चव्हाण यांनी ‘कुठं ठिगळ लावू आभाळ फाटले, आजार असा कसा हे प्रेम आटले’ या काव्यपंक्तीतून सामान्य माणसाची व्यथा बोलून दाखविली. राजेंद्र उगले यांनी देवालाच सवाल केला. ‘तुझ्यावरची भोळी श्रद्धा खोटी ठरवतो का, देवळात जाऊन म्हणतील लोक देव मेला का ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ हे काव्य सादर केले, तर पीयूष नाशिककर यांनी आपल्या कवितेतून अधोरेखित केले, ‘एकाच भडकलेल्या चितेवर धगधगणारे अनेक? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ ही कविता सादर केली. ‘या काळात इथे होम हवनाला आले नाही उधाण, पेटली नाही यज्ञकुंडे, की झाली नाही अजान. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?’ असा सवाल संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गंगाधर अहिरे यांनी काव्यातून विचारला. यावेळी शंकर बोऱ्हाडे, संतोष वाटपाडे, जयश्री कुलकर्णी, संजय गोरडे आदींनी विषयानुरूप कविता सादर केल्या.

सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले, तर मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.

फोटो

१०अहिरे