शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कवयित्री जयश्री पाठक यांचे निधन

By admin | Updated: February 4, 2015 02:01 IST

कवयित्री जयश्री पाठक यांचे निधन

नाशिक : येथील ज्येष्ठ कवयित्री जयश्री पाठक (६०) यांचे पुणे येथे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती राम पाठक, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. छंदोबद्धता हे पाठक यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते. ‘चंद्रकोर’ व ‘अनुकार’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर अन्य दोन बालसंग्रह प्रसिद्ध आहेत. पैकी ‘चंद्रकोर’ला प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांची प्रस्तावना लाभली आहे. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने होणाऱ्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. सावानाच्या बालभवन समितीच्या त्या सदस्य होत्या. अर्चना जोगळेकर व स्मिता आपटे यांच्या साथीने त्या ‘बहिणाईच्या बहिणी’ हा कार्यक्रम सादर करीत. त्यात त्या मराठी स्त्री कवितेचा समग्र आढावा घेत असत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहित्य रसिका मंडळाच्याही त्या अध्यक्ष होत्या. अनेक पुरस्कारही त्यांना लाभले होते. त्यांच्या निधनाने संवेदनशील कवयित्री हरपल्याची भावना शहरातील साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.