शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कवयित्री जयश्री पाठक यांचे निधन

By admin | Updated: February 4, 2015 02:01 IST

कवयित्री जयश्री पाठक यांचे निधन

नाशिक : येथील ज्येष्ठ कवयित्री जयश्री पाठक (६०) यांचे पुणे येथे मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती राम पाठक, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. छंदोबद्धता हे पाठक यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते. ‘चंद्रकोर’ व ‘अनुकार’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर अन्य दोन बालसंग्रह प्रसिद्ध आहेत. पैकी ‘चंद्रकोर’ला प्रख्यात कवयित्री शांता शेळके यांची प्रस्तावना लाभली आहे. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने होणाऱ्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. सावानाच्या बालभवन समितीच्या त्या सदस्य होत्या. अर्चना जोगळेकर व स्मिता आपटे यांच्या साथीने त्या ‘बहिणाईच्या बहिणी’ हा कार्यक्रम सादर करीत. त्यात त्या मराठी स्त्री कवितेचा समग्र आढावा घेत असत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहित्य रसिका मंडळाच्याही त्या अध्यक्ष होत्या. अनेक पुरस्कारही त्यांना लाभले होते. त्यांच्या निधनाने संवेदनशील कवयित्री हरपल्याची भावना शहरातील साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.