शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

भाजीपाल्यांचे ढीग रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST

पाटोदा : शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या कोणत्याच पिकाला दर मिळत नसल्याने भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त ...

पाटोदा : शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या कोणत्याच पिकाला दर मिळत नसल्याने भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे ठिकठिकाणी टोमॅटो, शिमला मिरची, डांगर, भोपळे, कारले, कोबी, फ्लॉवर व भाजीपाल्याचे लाल, हिरवे डोंगर दिसत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी व निसर्गाशी दोन हात करीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले. मात्र पाऊस व वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर करपा, फळकुज, तिरंगा, फळांना तडे जाणे, तसेच मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून तसेच महागडी औषधे व कीटकनाशकांची फवारणी करून पिके जगवली, मात्र आता याच मालाला दमडीच्या भावातही कुणी घ्यायला तयार नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकाला फेकून देण्याची वेळ आली आहे. शेतमाल तोडण्याची मजुरी तसेच भाजीपाला वाहतुकीसाठी आलेला खर्चही शेतकऱ्यांना खिशातून करावा लागत असल्याने आर्थिक कोंडी झाली असून, खते व औषधांच्या उधारीचे पैसे कसे फेडायचे, हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

--------------------

बाजारभाव कोसळण्याची कारणे

मागील वर्षी शेतमाल व भाजीपाला उत्पादनातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाची लागवड केली. पावसाचे प्रमाणही कमी असल्याने नुकसान कमी झाले, त्यामुळे उत्पादन वाढले असून, एकाच वेळी आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दर कोसळले असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

..........................................

पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावून भाजीपाला उत्पादन घेतले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षण, शेतीसाठी भांडवल व घर खर्चासाठी पैसे उपलब्ध होतील, अशी आशा होती. मात्र हातातोंडाशी आलेला घास दर कोसळल्यामुळे हिरावला गेला असून, मोठी निराशा झाली आहे. मजूर, गाडीभाडे, तसेच औषध दुकानदारांची देणी देणे अवघड होऊन बसले आहे.

- ज्ञानेश्वर बोरनारे, शेतकरी, पाटोदा (२६ पाटोदा १/२)

260821\26nsk_13_26082021_13.jpg

२६पाटोदा १/२