शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कार्यालय क्षमतेच्या तुलनेत ५० टक्के परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST

नाशिक : राजकीय सभा, मेळावे, मुख्य बाजारपेठांमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसताना केवळ विवाह सोहळ्यांना १०० नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा घालणे ...

नाशिक : राजकीय सभा, मेळावे, मुख्य बाजारपेठांमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसताना केवळ विवाह सोहळ्यांना १०० नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा घालणे योग्य नाही. केवळ विवाहांमुळे कोरोना फैलावत नसल्याने पूर्वीप्रमाणे कार्यालय क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हा केटरींग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात साखळी उपोषणासह जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम गाढवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गत वर्षभर कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे सर्व केटरींग व्यावसायिकांचे व्यवसाय कोलमडून पडू लागले आहेत. जिल्ह्यातील व्यावसायिकांचे सुमारे १५० कोटींचे नुकसान तसेच प्रत्येक लग्न तिथीला हजारो बेरोजगारांना मिळणारा रोजगार बुडत असून त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपजिवीकेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची दहशत काहीशी कमी होऊन परिस्थिती सुधारत असताना १०० नागरिकांच्या उपस्थितीचा निर्बंध अन्यायकारक आहे. कोणत्याही मंगल कार्यालय किंवा लॉन्स क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीच्या पूर्वीच्या नियमाला पुन्हा लागू करण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे गाढवे यांनी नमूद केले. यावेळी पंकज पाटील, अनिल जोशी, अमर वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

अन्यथा जनहित याचिका

येत्या १५ दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास जनहीत याचिका तसेच राज्यभरात संघटनेच्या वतीने साखळी उपोषणासह सर्व पर्यायांचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा राहुल भावे यांनी दिला. तसेच विवाह समारंभात कुणी मास्क लावला नसेल, त्यालाच दंड करावा . त्यासाठी कार्यालय किंवा आयोजकांना दंड करणे अयोग्य असल्याचेही भावे यांनी नमूद केले.