शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
7
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
8
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
9
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
10
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
11
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
12
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
13
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
14
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
15
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
16
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
17
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
18
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
19
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
20
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली

पंचनाम्याचे आदेश, मदतीचे काय?

By admin | Updated: August 4, 2016 02:09 IST

प्रशासनही पेचात : नुकसानग्रस्त वाऱ्यावर

 नाशिक : गोदावरीसह अन्य नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने तलाठ्यांना दिले असले तरी, पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची कोणतीही तरतूद शासन दरबारी नसल्याने नुकसानग्रस्त वाऱ्यावर सोडले जाण्याची शक्यता अधिक आहे. मंगळवारी नाशिक शहरातील गोदावरी, नासर्डी, वाघाडी या नद्यांना पूर येऊन जनसंपर्क तुटण्याबरोबरच, नदी व नाल्यांच्या काठी राहणाऱ्या वस्तीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मल्हारखाण झोपडपट्टी, सराफ बाजार, बालाजी कोट, रोकडोबा घाट, नाव दरवाजा, मोदकेश्वर, दहीपूल, कानडे मारुती लेन, शिवाजी वाडी, बजरंगवाडी, आरटीओ कॉलनी, रामकुंड परिसर, कथडा, गणेशवाडी, तपोवनरोड, नागचौक, गंगावाडी परिसर तसेच उंटवाडी, कांबळेवाडी आदि भागात पुराचे पाणी शिरून नागरिकांचे संसारपयोगी साहित्य वाहून गेले, तर दुकानदारांनाही मोठी झळ सोसावी लागली. नाशिक शहराप्रमाणे जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातही नदी, नाल्यांना आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले. याशिवाय बंधारे फूटून शेतात पाणी शिरल्याचे तर पिके वाहून गेल्याच्याही तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना आदेश देऊन पंचनामे करण्याची सूचना केली आहे. परंतु पुरात झालेल्या वित्तहानीची नुकसानभरपाई देण्याची कोणतीही तरतूद आपत्ती व्यवस्थापन वा मदत, पुनर्वसन कायद्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तलाठ्यांनी पंचनामे केले तरी, त्याची भरपाई पूरग्रस्तांना मिळेलच याची कोणतीही शाश्वती प्रशासन देत नाही.