शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पंचनाम्याचे आदेश, मदतीचे काय?

By admin | Updated: August 4, 2016 02:09 IST

प्रशासनही पेचात : नुकसानग्रस्त वाऱ्यावर

 नाशिक : गोदावरीसह अन्य नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने तलाठ्यांना दिले असले तरी, पूरपरिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची कोणतीही तरतूद शासन दरबारी नसल्याने नुकसानग्रस्त वाऱ्यावर सोडले जाण्याची शक्यता अधिक आहे. मंगळवारी नाशिक शहरातील गोदावरी, नासर्डी, वाघाडी या नद्यांना पूर येऊन जनसंपर्क तुटण्याबरोबरच, नदी व नाल्यांच्या काठी राहणाऱ्या वस्तीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मल्हारखाण झोपडपट्टी, सराफ बाजार, बालाजी कोट, रोकडोबा घाट, नाव दरवाजा, मोदकेश्वर, दहीपूल, कानडे मारुती लेन, शिवाजी वाडी, बजरंगवाडी, आरटीओ कॉलनी, रामकुंड परिसर, कथडा, गणेशवाडी, तपोवनरोड, नागचौक, गंगावाडी परिसर तसेच उंटवाडी, कांबळेवाडी आदि भागात पुराचे पाणी शिरून नागरिकांचे संसारपयोगी साहित्य वाहून गेले, तर दुकानदारांनाही मोठी झळ सोसावी लागली. नाशिक शहराप्रमाणे जिल्ह्णाच्या ग्रामीण भागातही नदी, नाल्यांना आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले. याशिवाय बंधारे फूटून शेतात पाणी शिरल्याचे तर पिके वाहून गेल्याच्याही तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना आदेश देऊन पंचनामे करण्याची सूचना केली आहे. परंतु पुरात झालेल्या वित्तहानीची नुकसानभरपाई देण्याची कोणतीही तरतूद आपत्ती व्यवस्थापन वा मदत, पुनर्वसन कायद्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तलाठ्यांनी पंचनामे केले तरी, त्याची भरपाई पूरग्रस्तांना मिळेलच याची कोणतीही शाश्वती प्रशासन देत नाही.