शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दंडही हवाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:56 IST

पाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा.

साराशकिरण अग्रवालपाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच अशी स्वच्छता मोहीम राबविली जाते. नित्य-नैमित्तिक पातळीवर जी सफाई राहून जाते ते ‘ब्लॅक स्पॉट’ हेरून ते यानिमित्ताने स्वच्छ केले जातात. त्यामुळे अशा मोहिमा उपयोगी निश्चितच ठरतात. पण त्या राबविल्या जाताना त्याकडेही केवळ शासकीय उपचार म्हणून पाहणाºयांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे, जनजागृतीसह दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाणेही आवश्यकच ठरावे. विशेष म्हणजे नाशकात स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३५० टन कचरा संकलित केला गेला. यासाठी २८ हजारांवर नागरिकांचा सहभाग लाभला, ज्यात शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणीय होते. पण या गर्दीत विद्यार्थी व सामान्य नागरिक ज्या प्रामाणिकपणे सफाई करताना दिसून आले, तसे शासकीय कर्मचारी व राजकीय कार्यकर्त्यांच्या बाबतीत अपवादानेच दिसू शकले. स्वत: पालकमंत्री महाजन सक्रियपणे स्वच्छता करत असताना अनेकांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहात ‘सेल्फी’ काढून चमकोगिरी करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी मानसिकता असताना विरोधी पक्षीयांनीही यासाठी फारसा उत्साह किंवा सहभाग दाखविलेला दिसून येऊ शकला नाही. उलट अशी मोहीम एक दिवस राबवून फोटोसेशन करून घेण्याऐवजी रोज स्वच्छतेची काळजी घेतल्यास अशा मोहिमा राबविण्याची वेळ येणार नाही, अशी टीका केली. अर्थात, आपल्याकडील एकूणच मानसिकता लक्षात घेता, विशेषत्वाने काही मोहिमा हाती घेतल्याखेरीज उद्देशित कामे पार पडत नाहीत. त्यामुळे जे केले गेले ते चांगलेच झाले, फक्त त्याबद्दलची जाणीव रुजविली जाणे गरजेचे आहे. पालकमंत्री महाजन म्हणतात त्याप्रमाणे स्वच्छता हा खरेच सवयीचा भाग आहे. त्यामुळे ही आपल्या स्वत:पासून सुरू करून अंगवळणी पडणे गरजेचे आहे. शिवाय, अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाई केली गेल्याखेरीज ही सवय लागणार नाही. शहरातील कचºयाची ठिकाणे निश्चित करून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याद्वारे अस्वच्छता करणारे शोधण्याचा विचारही महाजन यांनी बोलून दाखविला आहे. तेव्हा, तसे झाले तर खरेच त्याचा परिणाम दिसून येऊ शकेल. विनामूल्य मिळणाºया वस्तूबाबत जसे कुणाला गांभीर्य नसते, तसे कारवाईची अगर दंडाची भीती असल्याशिवाय नागरिकांना शिस्त लागत नाही, हे खरे असल्याने पालकमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतल्यास सुज्ञ नाशिककर त्याचे स्वागतच करतील.