शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शांतता, निवडणुका सुरू आहेत !

By admin | Updated: February 14, 2017 01:23 IST

महापालिकेची नकारघंटा : नागरी कामांबाबतही टाळाटाळ

नाशिक : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबत असलेली यंत्रणा आणि सध्या लागू असलेली आदर्श आचारसंहिता यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. राजीव गांधी भवनात निरव शांतता असून, नागरी कामांसाठी नागरिक येत नाही आणि आले तरी त्यांचे काम होत नाही. अगदी आरोग्य विभागापासून सर्वच खात्यात गेल्यानंतर सध्या निवडणुकांची कामे आहेत, नंतर या असे सांगून बोळवणूक केली जात आहे.  महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अगोदरच कोणतेही काम होत नाही. त्यात आता बहुतांशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामांची जबाबदारी असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या अन्य कामांवर झाला आहे. राजीव गांधी भवनात अधिकारी आणि कर्मचारी भेटत नाहीत, भेटले तर सध्या निवडणुकीची धावपळ सुरू आहे. पुढील महिन्यात या, असे सांगितले जात आहे. निवडणुकांमुळे मुळातच नगरसेवक किंवा अन्य राजकीय कार्यकर्ते महापालिकेकडे  फिरकत नाहीत, परंतु पालिकेत नकारघंटा ऐकण्यास येत असल्याने नागरिकांचेही येणे कमी झाले आहे. त्यामुळे राजीव गांधी भवनात जेमतेमच वावर असतो.नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोयकेवळ महापालिकेच्या मुख्यालयातच नव्हे तर सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये अशीच अवस्था आहे. विभागीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे होत नाही. अस्वच्छतेपासून ते जन्ममृत्यू दाखल्याच्या कामासाठी गेलेल्या नागरिकांना पंधरा - वीस दिवसांनंतर या आता कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले आहेत, असे सांगण्यात येत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मनपाच्या वतीने तक्रार निवारणासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याची दखल घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नाहीत अशी परिस्थिती आहे.