शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

किरकोळ घटना वगळता शहरात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:54 IST

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़

ठळक मुद्देभीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद : आज नाशिक बंद, शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त;सोशल मीडियावरील अफवांमुळे वाढला तणावनाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात

07 वाहनांचे झाले नुकसान20 संशयित घेतले ताब्यात1500 पोलिसांचा ताफा

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसविणाºयांवर सायबर सेलची नजर असून, अशांवर कारवाई केली जाणार आहे़सोशल मीडियावरून पसरलेल्या संदेशामुळे भीमा-कोरेगाव घटनेचे राज्यात सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटले़ नाशिकरोड परिसरातील सामाजिक संघटनांनी या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले़ दुपारी देवळाली कॅम्प परिसर बंद ठेवण्यात आला तर गरवारे पॉइंटवर रास्ता-रोकोसाठी आलेल्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले़ सोशल मीडियावर वॉचसोशल मीडियावरील फे सबुक, व्हॉट्स अ‍ॅप, टिष्ट्वटर याद्वारे भीमा-कोरेगाव घटनेबाबत मोठ्या संख्येने व्हिडीओ तसेच भडकविणारे संदेश पाठविण्यात आले असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे अशा प्रकारचे संदेश पाठविणारे ग्रुप, तसेच व्यक्तींवर आयुक्तालयातील सायबर शाखेचा विशेष वॉच आहे़ त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे संदेश व्हायरल न करता डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ आयुक्तालयात शांतता समितीची बैठकभीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयात मंगळवारी सायंकाळी आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले़ आमदार सीमा हिरे यांनी नाशिक हे शांतताप्रिय शहर असून, त्यास गालबोट लागणार नाही याबाबत सदस्यांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले़ यावेळी शांतता समितीतील सर्वधर्मिय सदस्यांसह पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़दीड हजार पोलीस रस्त्यावरविविध राजकीय पक्ष व संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि़३) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात अफवा पसरून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील ११० वरिष्ठ पोलीस अधिकारी, दीड हजार पोलीस कर्मचारी, आरसीपी, क्यूआरटीच्या टीम रस्त्यावर असणार आहे़ याबरोबरच एसआरपीएफ व होमगार्डची जादा कुमक बंदोबस्तासाठी मागविण्यात आली आहे़ कायदा हातात घेऊ नकाभीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदाव सुव्यवस्थेसाठी पोलिसांच्या साप्ताहिकसुट्या बंद करण्यात आल्या आहेत़ शहरात दीडहजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ठिकठिकाणी नाकाबंदी व चेक पॉइंट लावण्यात आला आहे़ सोशल मीडियावर अफवा व भडकाऊ संदेश पाठविणाºयांवर सायबर सेलचा वॉच असून, थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक