शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

किरकोळ घटना वगळता शहरात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:54 IST

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़

ठळक मुद्देभीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद : आज नाशिक बंद, शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त;सोशल मीडियावरील अफवांमुळे वाढला तणावनाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात

07 वाहनांचे झाले नुकसान20 संशयित घेतले ताब्यात1500 पोलिसांचा ताफा

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीचे पडसाद मंगळवारी शहरात उमटले़ नाशिकरोड-जेलरोड व सारडा सर्कल परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस तर सातपूर-आयटीआय पुलाजवळ शाळेची खासगी बस व दोन खासगी वाहनांंवर समाजकंटकांनी दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या़ या घटना वगळता शहरात शांतता असून, नाशिकरोड परिसरातील २० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसविणाºयांवर सायबर सेलची नजर असून, अशांवर कारवाई केली जाणार आहे़सोशल मीडियावरून पसरलेल्या संदेशामुळे भीमा-कोरेगाव घटनेचे राज्यात सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटले़ नाशिकरोड परिसरातील सामाजिक संघटनांनी या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले़ दुपारी देवळाली कॅम्प परिसर बंद ठेवण्यात आला तर गरवारे पॉइंटवर रास्ता-रोकोसाठी आलेल्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले़ सोशल मीडियावर वॉचसोशल मीडियावरील फे सबुक, व्हॉट्स अ‍ॅप, टिष्ट्वटर याद्वारे भीमा-कोरेगाव घटनेबाबत मोठ्या संख्येने व्हिडीओ तसेच भडकविणारे संदेश पाठविण्यात आले असून, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे अशा प्रकारचे संदेश पाठविणारे ग्रुप, तसेच व्यक्तींवर आयुक्तालयातील सायबर शाखेचा विशेष वॉच आहे़ त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे संदेश व्हायरल न करता डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ आयुक्तालयात शांतता समितीची बैठकभीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयात मंगळवारी सायंकाळी आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शांतता समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले़ आमदार सीमा हिरे यांनी नाशिक हे शांतताप्रिय शहर असून, त्यास गालबोट लागणार नाही याबाबत सदस्यांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले़ यावेळी शांतता समितीतील सर्वधर्मिय सदस्यांसह पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़दीड हजार पोलीस रस्त्यावरविविध राजकीय पक्ष व संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि़३) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात अफवा पसरून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील ११० वरिष्ठ पोलीस अधिकारी, दीड हजार पोलीस कर्मचारी, आरसीपी, क्यूआरटीच्या टीम रस्त्यावर असणार आहे़ याबरोबरच एसआरपीएफ व होमगार्डची जादा कुमक बंदोबस्तासाठी मागविण्यात आली आहे़ कायदा हातात घेऊ नकाभीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदाव सुव्यवस्थेसाठी पोलिसांच्या साप्ताहिकसुट्या बंद करण्यात आल्या आहेत़ शहरात दीडहजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ठिकठिकाणी नाकाबंदी व चेक पॉइंट लावण्यात आला आहे़ सोशल मीडियावर अफवा व भडकाऊ संदेश पाठविणाºयांवर सायबर सेलचा वॉच असून, थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक