शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

वेतन रखडले : कुष्ठ व क्षयरोग विभागाला झाला क्षय

By admin | Updated: December 20, 2014 00:36 IST

राज्यातील १६०० कर्मचाऱ्यांची उपासमार

प्रवीण साळुंके   मालेगावराज्यात अनुदानाअभावी आरोग्य विभागाच्या कुष्ठ व क्षयरोग विभागाच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे १६०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात मालेगाव शहरातील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आरोग्यविभागाच्या आडमुठे भुमिकेमुळे पाच महिन्यापासून मानधनापासून वंचित राहावे लागले आहे. राज्यात आरोेग्य विभागाच्या अंतर्गत कुष्ठ व क्षयरोग विभागाच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीतर्फे कुष्ठ व क्षयरोग निदान कार्यक्रम सुुरू आहे. या विभागात मानधनावर १६०० कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून, या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांना जून महिन्यांचे मानधन देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या चार महिन्यात त्यांना वेतन न मिळाल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मालेगाववगळता इतर ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आले आहे. यासाठी या विभागाचे पुणे येथील सहसंचालकांनी १४ आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून ‘अनुदान प्राप्त होईपर्यंत आपल्या फंडातून सदर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी उसनवार पैसे देण्याची विनंती केली होती. या पत्राला राज्यातील इतर महापालिकांनी माणुसकीच्या भावनेतून प्रतिसाद देत दिवाळीसाठी या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अदा केले होते. यात मालेगाव महानगरपालिका अपवाद ठरली होती. येथील मनपात सदर पत्रावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी आरोग्यधिकाऱ्यांना लेखी दिले होते. मात्र येथील आरोग्यधिकाऱ्यांनी या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शहरात काम करणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. राज्यात २००९ साली या सोसायट्या वेगळ्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येत असून, त्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जाते. हे अनुदान जिल्हा परिषद, महानगरपालिकांकडे वर्ग करण्यात येते. त्यानंतर सदर महापालिका किंवा जिल्हापरिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांना मानधनाचे किंवा वेतनाचे वाटप करत असते. शासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा क्षयरोग नियंत्रणाचे काम थांबून या रोगाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.