शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

पाथर्डीचे ग्रामस्थ जाणार न्यायालयात

By admin | Updated: December 22, 2014 00:53 IST

त्र्यंबकेश्वरचा कचरा : पाथर्डी परिसरातील सध्याचा खतप्रकल्प हटविण्याची मागणी

नाशिक : त्र्यंबकेश्वरचा कचरा महापालिकेच्या खतप्रकल्पात आणण्यास विरोध करणारे पाथर्डीचे रहिवासी उच्च न्यायालय आणि पुण्याच्या हरित न्यायाधिकरणात दाद मागणार आहे. ज्या महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रातील कचऱ्यावर प्रक्रिया करता येत नाही, ती आणखी कचरा स्वीकारून नागरिकांचा जीव धोक्यात घालत असल्याची कैफियत संबंधित न्यायव्यवस्थेपुढे मांडणार आहेत.त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी प्रदूषण आणि सीमेंट स्लॅबखाली असलेले नदीपात्र खुले करण्यासंदर्भात पुण्याच्या हरित न्यायाधिकरणाकडे पर्यावरणप्रेमींनी याचिका दाखल केली आहे. त्याअनुषंगाने झालेल्या सुनावणीत आधी त्र्यंबकेश्वरचे पूजाविधीनंतरचे साहित्य आणि आता संपूर्ण घनकचराच महापालिकेच्या खतप्रकल्पात पाठविण्याची सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेचा खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसून त्यातून अवघे चार टक्के खत मिळते. त्यामुळे या भागात कचऱ्याचे डोंगर उभे असून, प्रक्रियेचे पाण्यामुळे परिसरातील जलाशये प्रदूषित झाली आहेत. त्यामुळे अगोदरच पाथर्डी येथील ग्रामस्थांनी महापालिकेविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचाही सामना करावा लागतो.न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याने आता अवमान याचिका दाखल झाली आहे. खतप्रकल्पावर हंगामी कर्मचारीही महापालिका नियुक्त करीत नसल्याने उच्च न्यायालयाने आता ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविली असून, महापालिकेला त्यासाठी एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत आणखी कचरा आणल्याने आरोग्य आणि पर्यावरण असा दुहेरी प्रश्न निर्माण होणार असल्याचे पाथर्डी परिसराचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)