शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

पालकांनी मुलांच्या कल्पकतेचे समर्थन करणे गरजेचे

By admin | Updated: March 25, 2017 23:55 IST

नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मतशंतनु गुणे यांनी केले.

नाशिक : उद्योग व व्यवसायात प्रगती साधण्यासाठी योग्य क्षेत्राची निवड करून त्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी नव उद्योजकांनी धेय्याप्रती एकाग्र होऊन प्रयत्न केले पाहिजे, असे मत सृजन क न्सल्टंटचे संस्थापक शंतनु गुणे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात रस आहे, याची जाणीव करून घेत आई-वडिलांनीही पाल्यांच्या कल्पकतेला व व्यावसायिक निर्णयाला पाठबळ देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शंकाराचार्य न्यास येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात ‘करिअरच्या अलीकडे आणि पलीकडे’ चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना ते शनिवारी (दि.२५) बोलत होते. याप्रसंगी गुणे म्हणाले, एकीकडे शैक्षणिक जीवनात दहावीनंतर पालकांना त्यांच्या पाल्यांना कोणत्या शाखेत पाठवायचे, असा प्रश्न पडतो, तर दुसरीकडे या वयातील अनेकजण यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचे सामर्थ्य सिद्ध करीत आहेत. कारण अशा मुलांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांच्या पालकांनी पूर्णपणे विश्वासार्हता दाखवित पाठिंबा दिलेला असतो. असाच समर्थन सर्व पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या मागे खंबीरपणे उभे केले, तर नव्या पिढीतील उद्योजकात नक्कीच वाढीला लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अशाचप्रकारे अल्प वयातील उद्योजक म्हणून समोर आलेला आणि कुंभमेळ्यातील गर्दीची मोजणी करणारे अ‍ॅप विकसित करणारा विलय कुलकर्णी यानेही उपस्थितांना मार्गदर्शन केले. तो म्हणाला, कोणत्याही क्षेत्रात आपल्याला काम करायचे असल्यास त्या क्षेत्राविषयीची माहिती आई-वडिलांना पटवून दिले तर ते पाल्याच्या मागे ठामपणे उभे राहतात. केवळ आपण जे करतो त्याविषयी त्यांना विश्वासार्हता निर्माण होईल एवढ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पना मांडायला हव्या. चर्चासत्रानंतर गिरीश पगारे यांनी अश्विन कंडोई व डॉ. महेश सिंघवी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन पिढीत उद्योजकतेचा विकासासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळवून देणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)