शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
न्यायालयीन क्षेत्रात खळबळ! बीडमधील वडवणी कोर्टात सरकारी वकिलाने संपवले जीवन
5
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
6
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
7
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
8
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
9
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
10
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
11
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
12
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
13
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
14
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
15
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
16
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
17
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
18
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
19
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
20
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...

तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यात पालकांचेही योगदान आवश्यक ! - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ...

नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली

असल्याने तिसरी लाट आली तरी तिचा फार मोठा परिणाम बालकांवर होणार नाही. तसेच पालकांनी बालकांच्या आरोग्याबाबत पुरेशी काळजी घेतल्यास तिसऱ्या लाटेचा प्रभाव डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाने रोखणे पालकांनादेखील शक्य असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाची लागण युवकांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दुसऱ्या लाटेपासूनच निदर्शनास येत आहे. त्यात तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठित करण्याचे आदेशदेखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केवळ बालकांसाठी नवीन रुग्णालये, कोविड सेंटर्स, बेडची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असले तरी नागरिकांनीदेखील आपल्या बालकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालकांनी जर मनावर घेतले तर ते तिसरी लाट रोखू शकतात, असेच बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बालकांबाबत ही घ्यावी दक्षता

बालकांना सकस आणि प्रथिनयुक्त पौष्टिक अन्न द्यावे.

बाहेरून कोणताही रेडिमेड खाद्यपदार्थ मागवू नये.

बालके सोसायटीत भावंडासमवेत खेळत असली तरी मास्क लावावा.

मास्क घालताना त्यांना श्वास लागत नाही, याबाबत दक्षता घ्यावी.

ताप, पोटदुखी, सर्दी, खोकला, घसा खवखवणे या लक्षणांची तातडीने दखल घ्यावी.

-----------

कोट

बालकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल, अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम ठेवावा. त्यांना दररोज घरातल्या घरात किंवा गच्चीत थोडा फार व्यायाम करण्यास प्रोत्साहित करावे. तसेच तिसऱ्या लाटेबाबत घाबरून न जाता पुरेशी दक्षता घेण्याबाबत पालकांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ, थंडपदार्थ, कोल्ड्रिंक टाळण्याबाबत पालकांनीच दक्षता बाळगणे हितकारक ठरणार आहे.

-डॉ. सुशील पारख, बालरोगतज्ज्ञ

कोट

सध्या बालके घराबाहेर जात नसली तरीही त्यांना वारंवार स्वच्छता, मास्क, या बाबींचे पालन करण्यास सांगावे. कोरोनाचा प्रभाव बालकांवर सध्या तरी फार प्रमाणात नाही. तसेच जगातही ब्राझिलवगळता अन्यत्र कुठेही फार मोठ्या प्रमाणात बालकांची जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे पालकांनी तिसऱ्या लाटेबाबत घाबरून जाण्याची आवश्यकता नसली तरी ताप, खोकल्यासह कोणतीही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. मंदार वैद्य, बालरोगतज्ज्ञ

-----

अंगावर पिणारे बाळ असले तरी प्रत्येक आईने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लहान बाळांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण खूप कमी असेल. तसेच बहुतांश बालके गोळ्या, औषधांनी बरी होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. अन्य बालकांबाबत स्वच्छतेचे आणि आरोग्याबाबतचे सर्व नियम कटाक्षाने पाळले जायला हवे आहेत.

-डाॅ. संजय आहेर, बालरोगतज्ज्ञ

तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येक पालकाचा आणि प्रत्येक भारतीयाला हातभार लावावा लागणार आहे. तिसरी लाट येईपर्यंत किमान ४० ते ५० टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण होणे आवश्यक आहे. तसेच दक्षता म्हणून लॉकडाऊन उठल्यानंतरही पुढील ६ महिने मुलांना बाहेर पाठवू नये. बालकांनी किरकिर करणे, ताप, जुलाब, उलट्या, भूक लागणे, डोळे लाल होणे, डोके दुखणे, पोट दुखणे, डोळे लाल होणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने टेस्ट करून उपचारांना प्रारंभ केल्यास तिसऱ्या लाटेबाबत फारसे घाबरण्याची गरज नाही.

-डॉ. शर्मिला कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ

·