शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

पावसाच्या माहेरघरीच पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: June 8, 2016 22:35 IST

पाणीटंचाई : वास्तव्य इगतपुरी तालुक्यात, पाण्यासाठी शहापूर तालुक्यात

 घोटी : जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर व नाशिक आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईची भीषण झळ बसत असल्याने महिलांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून पायपीट करीत चक्क ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. या वाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचा शासनाने केविलवाणा प्रयत्न केला; मात्र हे टॅँकर रस्त्याअभावी या वाड्यांपर्यंत पोहोचत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रचंड पर्जन्यवृष्टी असलेल्या इगतपुरीसारख्या आदिवासी तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटर अवघड व खडतर वळणांच्या डोंगरदऱ्यांतून पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. शासनाची सर्वव्यापक उदासीनता याला जबाबदार असल्याच्या प्रतिक्रि या ग्रामस्थ देत आहे.इगतपुरी शहराजवळून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आवळखेड हे १०० टक्के आदिवासी गाव आहे. या गावाच्या परिसरात काराची वाडी, जांभूळवाडी, वारेवाडी, चांदवाडी व वानरवाडी या आदिवासी बांधवांच्या छोट्या वाड्या आहेत. अतिशय निसर्गरम्य आणि डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या या परिसरात पावसाळ्यात दरवर्षी सरासरी जवळपास ३००० ते ३५०० मि.मी. एवढा प्रचंड पाऊस पडतो. मात्र पाणी येते आणि जाते. एवढा पाऊस होऊनदेखील या आदिवासी बांधवाना सध्या पिण्यालादेखील पाणी नसल्याचे भयानक वास्तव डोळ्यादेखत दिसत आहे. या वाड्यांच्या परिसरात तीन विहिरी आहेत. त्यात एका विहिरीत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी असल्यामुळे तिचा वापर होत नाही. एक विहीर शासनाची, तर एक खासगी आहे. एक गाव आणि सहा वाड्यांची तहान भागवण्यासाठी शासनामार्फत एक टॅँकर सुरू आहे. ते कधी येते त्याचे वेळापत्रक या महिलांना माहीत नाही. टॅँकर आल्यावर ते पाणी जवळपास शासनाच्या ७० फूट खोल विहिरीत टाकले जात आहे. त्यानंतर अतिशय तळाला असलेल्या या विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढण्याचा आणि हे पाणी घरापर्यंत नेण्याची महिला, पुरुष व लहान मुलांची होणारी कसरत हा एक थरारक अनुभव आहे.सकाळपासून ते सायंकाळपर्यंत घरासाठी पाणी वाहून नेणे हाच या आदिवासी महिलांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या मदतीसाठी शाळा व नोकरी करून पुरुष व लहान मुलांनादेखील धावपळ करावी लागत आहे. हीच अवस्था कसारा घाटात असणाऱ्या चिंचले व खैरे या गावाची आहे. या गावांतील महिलांनाही पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी लगतच्या शहापूर तालुक्यात जावे लागत आहे.