शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

ओझरखेड कालव्याला सोडले रबीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:20 IST

शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग : दुरुपयोग न करण्याचे आवाहन

शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.          येथील परिसराला लागून असलेल्या रबी हंगामातील पिके घेण्यासाठी या वर्षातील नुकतेच पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात बहुतांशी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा दुरुपयोग झाला असून रबी हंगामातील गहू, हरभरा, मका, उन्हाळी कांदे, जनावरांसाठी चारा व इतर भाजीपाला वर्गीय पिके घेण्यासाठी पाणी देणे गरजेचे असते.              ओझरखेड कालव्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जमिनीपैकी बहुतांशी जमीन डोंगर भागातील ओबड-धोबड व वरकस स्वरूपाचे आहे. त्यामुळे या भागात पडणारा पाऊस भौगोलिक रचनेमुळे लगेच वाहून जातो. तसेच अनियमित पाऊस झाला तर दुबार, तिबार पेरणीच्या संकटांना सामोरे जावे लागते. तेथील जमीन बहुतांशी भागात मुरमाड व हलक्‍या-मध्यम स्वरूपाची असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होण्यास वेळ लागत नाही.              काही ठराविक भागात पाणीटंचाईसुद्धा तितकीच भासली होती व उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे उन्हाच्या तीव्र माऱ्यामुळे पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते. परिसरातील रानवड, सावरगाव, नांदू शिरवाडे, मुखेड, वावी, नांदूर, गोरठाण गावातील परिसर व परिसरातील पाणीपुरवठा योजना या ओझरखेड कालव्याला येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असतात या गावातील पाणी वापर संस्थांचा व मागणीनुसार विभागाने बैठकीअंतर्गत पाण्याचे नियोजन केले जाते त्यामुळे या वर्षाच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.वर्षातील पहिले आवर्तनया वर्षातील पहिले आवर्तन सोडण्यात आले असून पाण्याचा योग्य वापर शेतकरीवर्गाने करावा. पाणी घेण्यासाठी कोणीही शेतकरीवर्गाने वंचित राहू नये. तसेच गाव तळे नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात यावे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे या गावांतील परिसराला पाणीटंचाई तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकagricultureशेती