शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अशक्तपणावर अशी करा मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी ...

नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी आणि एक ग्लास नारळपाणी प्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोरोना झाल्यानंतर त्याच्याविरुध्द लढण्यासाठी आपल्या शरिरातील बरीचशी ऊर्जा खर्च झालेली असते. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना अशक्तपणा जाणवतो. हातपाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, काहीच करण्यासाठी फारसा उत्साह नसणे अशी काही लक्षणे दिसतात. हे सर्व अशक्तपणामुळे होत असते. कोरोनाशी लढताना खर्ची पडलेली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी रुग्णांनी संतुलित आहार घेण्याची गरज असते. यासाठी रोजच्या जेवणात एकवेळ तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी, दिवसभरात किमान चार ते पाच ओले काळे खजूर खायला हवेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसातून एकदा अंजीर आणि किसमिसचा ज्यूस घ्यावा, यामुळे नैसर्गिकरित्या शरिरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. कोरोना अथवा कोणताही आजार असो, या काळात आपल्या पेशी कमी होत असतात. यासाठी आपल्या आहारात प्रोटीन वाढविणारे अन्नघटक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सकाळी नाष्ट्यामध्ये मोड आलेली मुगाची उसळ , बॉईल चणा, मटकीची उसळ, घरगुती पनीर, पनीर पराठा यांचा समावेश करावा. रोजच्या जेवणात साल असलेली मुगाची डाळ खावी. आजारपणानंतर डीहायड्रेशनचे प्रमाणही वाढते. घशाला, तोंडाला कोरड पडते, यासाठी आखी फळ किंवा त्यांचा ज्यूस तर घ्यावाच पण दिवसातून किमान एक ग्लास नारळपाणी प्यायलाच हवे. सध्या बाजारात येत असलेले टरबूज, खरबूज याबरोबरच मोसंबी, संत्रा यांचा ज्यूस घेणेही शरिरासाठी आवश्यक असते. असा संतुलित आहार घेतल्यास रुग्णाला पुन्हा पहिल्यासारखी ऊर्जा तर मिळतेच त्याचबरोबर ताजेतवानेही वाटते आणि पुन्हा काम करण्याचा उत्साह येतो, असा सल्ला आहारतज्ज्ञ मीनल शिंपी यांनी दिला आहे.