शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अशक्तपणावर अशी करा मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी ...

नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी आणि एक ग्लास नारळपाणी प्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोरोना झाल्यानंतर त्याच्याविरुध्द लढण्यासाठी आपल्या शरिरातील बरीचशी ऊर्जा खर्च झालेली असते. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना अशक्तपणा जाणवतो. हातपाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, काहीच करण्यासाठी फारसा उत्साह नसणे अशी काही लक्षणे दिसतात. हे सर्व अशक्तपणामुळे होत असते. कोरोनाशी लढताना खर्ची पडलेली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी रुग्णांनी संतुलित आहार घेण्याची गरज असते. यासाठी रोजच्या जेवणात एकवेळ तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी, दिवसभरात किमान चार ते पाच ओले काळे खजूर खायला हवेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसातून एकदा अंजीर आणि किसमिसचा ज्यूस घ्यावा, यामुळे नैसर्गिकरित्या शरिरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. कोरोना अथवा कोणताही आजार असो, या काळात आपल्या पेशी कमी होत असतात. यासाठी आपल्या आहारात प्रोटीन वाढविणारे अन्नघटक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सकाळी नाष्ट्यामध्ये मोड आलेली मुगाची उसळ , बॉईल चणा, मटकीची उसळ, घरगुती पनीर, पनीर पराठा यांचा समावेश करावा. रोजच्या जेवणात साल असलेली मुगाची डाळ खावी. आजारपणानंतर डीहायड्रेशनचे प्रमाणही वाढते. घशाला, तोंडाला कोरड पडते, यासाठी आखी फळ किंवा त्यांचा ज्यूस तर घ्यावाच पण दिवसातून किमान एक ग्लास नारळपाणी प्यायलाच हवे. सध्या बाजारात येत असलेले टरबूज, खरबूज याबरोबरच मोसंबी, संत्रा यांचा ज्यूस घेणेही शरिरासाठी आवश्यक असते. असा संतुलित आहार घेतल्यास रुग्णाला पुन्हा पहिल्यासारखी ऊर्जा तर मिळतेच त्याचबरोबर ताजेतवानेही वाटते आणि पुन्हा काम करण्याचा उत्साह येतो, असा सल्ला आहारतज्ज्ञ मीनल शिंपी यांनी दिला आहे.