शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

अशक्तपणावर अशी करा मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी ...

नाशिक : कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर येणारा अशक्तपणा घालविण्यासाठी रोजच्या जेवणात किमान एकदा तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी आणि एक ग्लास नारळपाणी प्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोरोना झाल्यानंतर त्याच्याविरुध्द लढण्यासाठी आपल्या शरिरातील बरीचशी ऊर्जा खर्च झालेली असते. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना अशक्तपणा जाणवतो. हातपाय दुखणे, पोटऱ्या दुखणे, काहीच करण्यासाठी फारसा उत्साह नसणे अशी काही लक्षणे दिसतात. हे सर्व अशक्तपणामुळे होत असते. कोरोनाशी लढताना खर्ची पडलेली ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी रुग्णांनी संतुलित आहार घेण्याची गरज असते. यासाठी रोजच्या जेवणात एकवेळ तरी बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खावी, दिवसभरात किमान चार ते पाच ओले काळे खजूर खायला हवेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसातून एकदा अंजीर आणि किसमिसचा ज्यूस घ्यावा, यामुळे नैसर्गिकरित्या शरिरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. कोरोना अथवा कोणताही आजार असो, या काळात आपल्या पेशी कमी होत असतात. यासाठी आपल्या आहारात प्रोटीन वाढविणारे अन्नघटक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सकाळी नाष्ट्यामध्ये मोड आलेली मुगाची उसळ , बॉईल चणा, मटकीची उसळ, घरगुती पनीर, पनीर पराठा यांचा समावेश करावा. रोजच्या जेवणात साल असलेली मुगाची डाळ खावी. आजारपणानंतर डीहायड्रेशनचे प्रमाणही वाढते. घशाला, तोंडाला कोरड पडते, यासाठी आखी फळ किंवा त्यांचा ज्यूस तर घ्यावाच पण दिवसातून किमान एक ग्लास नारळपाणी प्यायलाच हवे. सध्या बाजारात येत असलेले टरबूज, खरबूज याबरोबरच मोसंबी, संत्रा यांचा ज्यूस घेणेही शरिरासाठी आवश्यक असते. असा संतुलित आहार घेतल्यास रुग्णाला पुन्हा पहिल्यासारखी ऊर्जा तर मिळतेच त्याचबरोबर ताजेतवानेही वाटते आणि पुन्हा काम करण्याचा उत्साह येतो, असा सल्ला आहारतज्ज्ञ मीनल शिंपी यांनी दिला आहे.