शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

जंगल संरक्षणासाठी ‘आड’वासीयांचा संघटित लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

नाशिक : ‘काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे’ या घोषवाक्याप्रमाणे पेठ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आडबुद्रुकमधील आदिवासी गावकऱ्यांनी जंगल संरक्षणाचा ...

नाशिक : ‘काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे’ या घोषवाक्याप्रमाणे पेठ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आडबुद्रुकमधील आदिवासी गावकऱ्यांनी जंगल संरक्षणाचा वसा घेत नैसर्गिक वनाची जोपासना करीत वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यास वनविभागाला मदत करत नव्याने मागील चार वर्षांत ४७ हजार रोपांची यशस्वी लागवड केली आहे. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करत वनविभागाच्या हातात देत आडवासीयांकडून जंगल संरक्षणासाठी संघटित लढा दिला जात आहे.

पेठ तालुक्यातील करंजाळीपासून पुढे काही अंतरावर आड बुद्रुक हा अवघ्या ६० ते ७० कुटुंबांचा पाडा शाश्वत विकासाकडे निसर्गसंवर्धन करीत गतिमान होत असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. या गावातील तरुणांनी राळेगणसिध्दी, हिरवे बाजार या गावांना शैक्षणिक सहलींद्वारे भेट देत तेथील जल, मृदा व वन संवर्धनातून प्रेरणा घेत आपल्या पाड्यावरील २१७.२१८हेक्टरवरील नैसर्गिक वन जपायचे अन‌् पाड्यावरील ओसाड वनजमिनींवर पुन्हा हिरवाई फुलवायची असा ध्यास घेतला २०११साली वनविभागाने गावकऱ्यांना एकत्र आणून संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली. वनविभागाच्या माध्यमातून वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी मागील वर्षी पाड्यावरील सर्व कुटुंबीयांना स्वयंपकाचा गॅस सिलिंडर-शेगडीचे वाटप केले. या पाड्यावरील गावकऱ्यांनी केवळ वृक्षारोपणावरच भर दिला असे नाही, तर लावलेली वृक्ष जगविण्याचीही काळजी घेतल्याने वनीकरण उत्तम असल्याचे चित्र दिसते.

--इन्फो--

जलसंधारणामुळे विहिरींचा जलस्तर उंचावला

नैसर्गिक जंगलात वनकर्मचाऱ्यांसोबत मिळून दगडी बांध बांधणे, सलग समतल चर खोदणे, पाणवठे निर्मितीमध्ये सहभाग घेतला. पावसाचे पाणी जमिनीत जिरावे यासाठी येथील प्रत्येक घराजवळ शोषखड्डे खोदण्यात आले आहेत. जल, मृदा संधारणाच्या कामे करण्यावरही गावकऱ्यांनी भर दिल्याने येथील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. उन्हाळ्यातसुध्दा येथील विहिरी मागील चार ते पाच वर्षांपासून तळ गाठत नसल्याचे गावकरी सांगतात.

--इन्फो--

मानव-वन्यप्राणी संघर्षावर मात

आडच्या नैसर्गिक जंगलात साग, बेहडा, खैर, सादडा, उंबर, धावडा, करवंदे, मोह, करंज आदी देशी प्रजातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. या वृक्षप्रजातीच्या संरक्षणामुळे येथील वन्यजीव बिबट्या, तरस, रानससे, माकड, रानमांजर, सायाळ, मुंगूस, घोरपड यांसारख्या वन्यप्राण्यांसह मोर, घुबड, पोपट यांसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांचाही अधिवास टिकून राहिलेला दिसून येतो. परिणामी नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहिल्याने या भागात मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत नाही.

--इन्फो--

अशी आहे संयुक्त वनव्यवस्थापन समिती

यशवंत रावजी महाले (अध्यक्ष), पांडुरंग तुकाराम महाले (उपाध्यक्ष), वनपाल शिवाजी बागल (सचिव), धर्मराज महाले, निवृत्ती गायकवाड, अर्जुन गावीत, शिताबाई चौधरी यांच्यासह १२ सदस्यांची समिती वनसंवर्धनासाठी कार्यरत आहे. या समितीचा मुख्य कणा म्हणजे गावातील तरुणाई आहे. येथील तरुणवर्ग हा निसर्ग संरक्षणाचे महत्त्व जाणून असल्याने अवैध वृक्षतोड, तस्करीचे प्रयत्न सहजरित्या हाणून पाडण्यास वनविभागालाही यश येते.

220721\22nsk_34_22072021_13.jpg~220721\22nsk_35_22072021_13.jpg

वन संवर्धन~गॅस वाटप