शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

जंगल संरक्षणासाठी ‘आड’वासीयांचा संघटित लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

नाशिक : ‘काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे’ या घोषवाक्याप्रमाणे पेठ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आडबुद्रुकमधील आदिवासी गावकऱ्यांनी जंगल संरक्षणाचा ...

नाशिक : ‘काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे’ या घोषवाक्याप्रमाणे पेठ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आडबुद्रुकमधील आदिवासी गावकऱ्यांनी जंगल संरक्षणाचा वसा घेत नैसर्गिक वनाची जोपासना करीत वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्यास वनविभागाला मदत करत नव्याने मागील चार वर्षांत ४७ हजार रोपांची यशस्वी लागवड केली आहे. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करत वनविभागाच्या हातात देत आडवासीयांकडून जंगल संरक्षणासाठी संघटित लढा दिला जात आहे.

पेठ तालुक्यातील करंजाळीपासून पुढे काही अंतरावर आड बुद्रुक हा अवघ्या ६० ते ७० कुटुंबांचा पाडा शाश्वत विकासाकडे निसर्गसंवर्धन करीत गतिमान होत असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे. या गावातील तरुणांनी राळेगणसिध्दी, हिरवे बाजार या गावांना शैक्षणिक सहलींद्वारे भेट देत तेथील जल, मृदा व वन संवर्धनातून प्रेरणा घेत आपल्या पाड्यावरील २१७.२१८हेक्टरवरील नैसर्गिक वन जपायचे अन‌् पाड्यावरील ओसाड वनजमिनींवर पुन्हा हिरवाई फुलवायची असा ध्यास घेतला २०११साली वनविभागाने गावकऱ्यांना एकत्र आणून संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली. वनविभागाच्या माध्यमातून वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी मागील वर्षी पाड्यावरील सर्व कुटुंबीयांना स्वयंपकाचा गॅस सिलिंडर-शेगडीचे वाटप केले. या पाड्यावरील गावकऱ्यांनी केवळ वृक्षारोपणावरच भर दिला असे नाही, तर लावलेली वृक्ष जगविण्याचीही काळजी घेतल्याने वनीकरण उत्तम असल्याचे चित्र दिसते.

--इन्फो--

जलसंधारणामुळे विहिरींचा जलस्तर उंचावला

नैसर्गिक जंगलात वनकर्मचाऱ्यांसोबत मिळून दगडी बांध बांधणे, सलग समतल चर खोदणे, पाणवठे निर्मितीमध्ये सहभाग घेतला. पावसाचे पाणी जमिनीत जिरावे यासाठी येथील प्रत्येक घराजवळ शोषखड्डे खोदण्यात आले आहेत. जल, मृदा संधारणाच्या कामे करण्यावरही गावकऱ्यांनी भर दिल्याने येथील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. उन्हाळ्यातसुध्दा येथील विहिरी मागील चार ते पाच वर्षांपासून तळ गाठत नसल्याचे गावकरी सांगतात.

--इन्फो--

मानव-वन्यप्राणी संघर्षावर मात

आडच्या नैसर्गिक जंगलात साग, बेहडा, खैर, सादडा, उंबर, धावडा, करवंदे, मोह, करंज आदी देशी प्रजातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. या वृक्षप्रजातीच्या संरक्षणामुळे येथील वन्यजीव बिबट्या, तरस, रानससे, माकड, रानमांजर, सायाळ, मुंगूस, घोरपड यांसारख्या वन्यप्राण्यांसह मोर, घुबड, पोपट यांसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांचाही अधिवास टिकून राहिलेला दिसून येतो. परिणामी नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहिल्याने या भागात मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत नाही.

--इन्फो--

अशी आहे संयुक्त वनव्यवस्थापन समिती

यशवंत रावजी महाले (अध्यक्ष), पांडुरंग तुकाराम महाले (उपाध्यक्ष), वनपाल शिवाजी बागल (सचिव), धर्मराज महाले, निवृत्ती गायकवाड, अर्जुन गावीत, शिताबाई चौधरी यांच्यासह १२ सदस्यांची समिती वनसंवर्धनासाठी कार्यरत आहे. या समितीचा मुख्य कणा म्हणजे गावातील तरुणाई आहे. येथील तरुणवर्ग हा निसर्ग संरक्षणाचे महत्त्व जाणून असल्याने अवैध वृक्षतोड, तस्करीचे प्रयत्न सहजरित्या हाणून पाडण्यास वनविभागालाही यश येते.

220721\22nsk_34_22072021_13.jpg~220721\22nsk_35_22072021_13.jpg

वन संवर्धन~गॅस वाटप