शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बारावीपूर्वी दहावी उत्तीर्ण अनिवार्य करण्याचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:14 IST

नाशिक : दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने एसएससी बोर्ड आणि राज्य सरकारला फटकारतानाच परीक्षा घ्यायचीच ...

नाशिक : दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने एसएससी बोर्ड आणि राज्य सरकारला फटकारतानाच परीक्षा घ्यायचीच नाही ही भूमिका योग्य नसल्याचे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविल्यानंतर दहावीच्या परीक्षा होणार की नाही, याविषयी पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाले आहे. मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर यथावकाश परीक्षा घेऊन बारावीपूर्वी विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्याचा पर्याय सध्य परिस्थिती उपलब्ध असून त्यावर विचार करण्याची गरज शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थीही आता परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार नाही. त्यातच कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही. अशा परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द करून परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यास अशा परिस्थितीत परीक्षा कशा देणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागासमोर पुढील सहा महिन्यात वर्षभरात परीक्षा घेण्याचा आणि बारावीची परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्याचा पर्याय न्यायालयात मांडून त्यानुसार कार्यवाही करण्याचा अथवा न्यायालयाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचाच पर्याय सध्या सरकार आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर उपलब्ध असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

---

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शालांत परीक्षा रद्द करण्याच्या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार उच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे करावा लागणार आहे. परीक्षार्थींची सुरक्षितता, पालकांचा दबाव व केंद्रीय मंडळाने घेतलेला परीक्षा न घेण्याचा निर्णय यामुळे शासनाने हा निर्णय थोड्या घाईतच घेतला होता. आता तज्ज्ञांशी विचारविनिमय करून शासन याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. हे यापूर्वीच झाले असते तर चांगले झाले असते. यापुढील काळात कोरोनासारखी अनपेक्षित संकटे येतील, असे गृहीत धरून शिक्षण क्षेत्रात ‘आपत्ती व्यवस्थापन’ कसे करायचे याचे नियोजन शासनाला करावे लागेल.

- प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ

--

कोट-

जेव्हा विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची तयारी होती, तेव्हाच ऑनलाईन का होईना परीक्षा घेणे आ‌वश्यक होते. परंतु, आता त्याला उशीर झाला आहे. विद्यार्थ्यांची आता तयारी नाही आणि कोरोनामुळे तशी परिस्थितीही नाही. मात्र उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याचा आदेश दिलाच तर परीक्षा घ्याव्याच लागतील. दहावीती परीक्षा महत्त्वाचीच आहे. मात्र सध्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देऊन पुढील वर्षभरात अथवा बारावीची परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याचा पर्याय आहे. त्यासाठी कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांनतर किंवा वर्षभरात परीक्षा घेता येईल. सध्या हाच पर्याय उपलब्ध असून त्यावर विचार करणे आवश्यक आहे.

- महेश दाबक, निती आयोग, शिक्षण समिती सदस्य

--------

मागील वर्ष विद्यार्थ्यांचे वर्ष घरीच गेले. पुढील वर्षही कोरोनाच्या संकटात जाण्याचे संकेत आहे. अशा परिस्थितीत शासनाने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. सीबीएसईच्या बहुतांश शाळांंमध्ये अकरावी बारावीचे वर्ग आहेत. त्यामुळे त्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, राज्य मंडळाच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. ९० टक्के शाळा दहावीपर्यंतच आहेत. असे असताना पुढील प्रवेशप्रक्रियेचा विचार न करता केवळ सीबीएसईने परीक्षा रद्द केल्याने राज्य सरकारनेही तसाच निर्णय घेतल्याने हा प्रश्न न्यायालयापर्यंत पोहोचला. दहावीच्या परीक्षाच रद्द करणे शैक्षणिकदृष्ट्या नुकसानकारक आहे. मात्र आता विद्यार्थ्यांची परीक्षेला सामोरे जाण्याची तायारीही नाही. असा पेच निर्माण झालेला असताना आता सरकारमोर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबाजवणी करण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही.

- दिलीप फडके, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ