शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनाची कवाडे उघडा, साचेबद्धतेतून बाहेर पडा

By admin | Updated: October 18, 2015 23:47 IST

विद्यागौरी टिळक : जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन

नाशिक : ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी मनाची कवाडे उघडत पूर्वग्रहदूषित, परंपरागत गोष्टींना छेद दिला. जाती या माणसाने तयार केल्या असल्याचे लक्षात घेत त्यांनी माणूसपण महत्त्वाचे मानले. सध्यादेखील समाज ठराविक कप्प्यांत अडकत चालला असून, त्याने लक्ष्मीबार्इंना समोर ठेवून या साचेबद्धतेतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ४८व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, उपाध्यक्ष नरेश महाजन, वासुदेव दशपुत्रे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. टिळक यांनी भाषणातून आपल्या पणजी लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, लक्ष्मीबार्इंकडे तटस्थतेने पाहताना व त्यांचे ‘स्मृतिचित्रे’ वाचताना अनेक नव्या गोष्टी लक्षात आल्या. त्यांच्या आयुष्यातील सर्वच गोष्टींना ना. वा. टिळक जबाबदार नव्हते. लक्ष्मीबार्इंकडे स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी होती. त्यांनी अनेक अंधश्रद्धा साफ धुडकावल्या. प्रा. डॉ. टिळक यांनी लक्ष्मीबार्इंच्या आयुष्यातील अनेक प्रसंंगांचे दाखले देत त्यांचे पुरोगामित्व पटवून दिले. लक्ष्मीबार्इंना अनेकांनी हट्टी म्हटले आहे; पण तसे होण्याची वेळ त्यांच्यावर का आली, याचाही विचार व्हावा. प्रारंभी पतीच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याला कडाडून विरोध करणाऱ्या लक्ष्मीबार्इंनी नंतर मनमोकळे धोरण अवलंबले. माणूस असणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे मानत त्यांनी मनाची कवाडे उघडून स्वत:ला तपासण्याची संधी घेतली. ओळखही नसलेल्या रुग्णांची सेवा करणे, अगदी प्रेते उचलायलाही पदर खोचून उभे राहणे, यातून हेच दिसून येते. आपल्याकडच्या शुचिर्भूततेच्या, भेदाच्या कल्पनांतून त्या बाहेर पडल्या आणि मनाला योग्य वाटेल तेच केले, हे आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. वर्षभरात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आली. किशोर पाठक यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत केंदळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)