शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
6
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
7
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
8
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
9
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
10
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
11
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
12
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
14
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
15
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
16
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
17
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
18
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
19
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
20
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

मनाची कवाडे उघडा, साचेबद्धतेतून बाहेर पडा

By admin | Updated: October 18, 2015 23:47 IST

विद्यागौरी टिळक : जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन

नाशिक : ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी मनाची कवाडे उघडत पूर्वग्रहदूषित, परंपरागत गोष्टींना छेद दिला. जाती या माणसाने तयार केल्या असल्याचे लक्षात घेत त्यांनी माणूसपण महत्त्वाचे मानले. सध्यादेखील समाज ठराविक कप्प्यांत अडकत चालला असून, त्याने लक्ष्मीबार्इंना समोर ठेवून या साचेबद्धतेतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ४८व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, उपाध्यक्ष नरेश महाजन, वासुदेव दशपुत्रे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. टिळक यांनी भाषणातून आपल्या पणजी लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, लक्ष्मीबार्इंकडे तटस्थतेने पाहताना व त्यांचे ‘स्मृतिचित्रे’ वाचताना अनेक नव्या गोष्टी लक्षात आल्या. त्यांच्या आयुष्यातील सर्वच गोष्टींना ना. वा. टिळक जबाबदार नव्हते. लक्ष्मीबार्इंकडे स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी होती. त्यांनी अनेक अंधश्रद्धा साफ धुडकावल्या. प्रा. डॉ. टिळक यांनी लक्ष्मीबार्इंच्या आयुष्यातील अनेक प्रसंंगांचे दाखले देत त्यांचे पुरोगामित्व पटवून दिले. लक्ष्मीबार्इंना अनेकांनी हट्टी म्हटले आहे; पण तसे होण्याची वेळ त्यांच्यावर का आली, याचाही विचार व्हावा. प्रारंभी पतीच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याला कडाडून विरोध करणाऱ्या लक्ष्मीबार्इंनी नंतर मनमोकळे धोरण अवलंबले. माणूस असणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे मानत त्यांनी मनाची कवाडे उघडून स्वत:ला तपासण्याची संधी घेतली. ओळखही नसलेल्या रुग्णांची सेवा करणे, अगदी प्रेते उचलायलाही पदर खोचून उभे राहणे, यातून हेच दिसून येते. आपल्याकडच्या शुचिर्भूततेच्या, भेदाच्या कल्पनांतून त्या बाहेर पडल्या आणि मनाला योग्य वाटेल तेच केले, हे आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. वर्षभरात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आली. किशोर पाठक यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत केंदळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)