शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

अरेरे! दोन वर्षांत गेले बारा कोटी परत आरोग्य विभागाची ढिलाई; दोषींवर कारवाई कधी

By admin | Updated: January 4, 2015 00:52 IST

अरेरे! दोन वर्षांत गेले बारा कोटी परत आरोग्य विभागाची ढिलाई; दोषींवर कारवाई कधी

  नाशिक : जिल्हा परिषदेत निधीसाठी सत्ताधाऱ्यांत जुंपल्याचे चित्र असताना मागील दोन वर्षांत चक्क एक-दोन नव्हे, तर बारा कोटींपेक्षा जास्त निधी शासनाला परत करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढविली असून, यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार काय? असा प्रश्नच आता काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सन- २०१०-११ व सन-२०११-१२ या दोेन वर्षांत आलेला प्राथमिक आरोग्य केंद्रांची व उपकेंद्रांच्या बिगर आदिवासी व आदिवासी भागातील बांधकामांसाठी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. निधी खर्च करण्यासाठी साधारणता दोन वर्षाचा अवधी शासनाने जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला आहे. इतके असूनही या दोन्ही वर्षांतील निधी वेळेत खर्ची न पडल्याने जिल्हा परिषदेला हा निधी शासनाला परत करण्याची नामुष्की ओढवली आहे. नुकतीच यासंदर्भातील माहिती शिक्षण व आरोग्य सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांनी आरोग्य विभाग व लेखा विभागाकडून घेतली. त्यावेळी सन २०१०-११ या आर्थिक वर्षात आलेल्या निधीपैकी सुमारे ५ कोटी २६ लाख तसेच सन २०११-१२ या आर्थिक वर्षात आलेल्या एकूण निधीपैकी सुमारे साडेसहा कोटींचा निधी सन २०१२-१३ व सन २०१३-१४ मध्ये शासनाला परत करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शासनाला निधी जमा केल्याची रितसर चलनेही लेखा विभागाकडे असल्याचे समजते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी परत जाण्याचे कारण काय? त्यास कारणीभूत कोण? त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार काय? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असून, त्यानुसार कारवाईची मागणी सभापती किरण थोरे करणार असल्याचे समजते.