शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

महापालिकेसाठी एक वाॅर्डातून एकच नगरसेवक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्षांनी तयारी आरंभली आहे. मात्र, ...

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्षांनी तयारी आरंभली आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य लाटदेखील निवडणुकीला अडसर ठरू शकते. त्यामुळे २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एक सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय झाल्यानंतरदेखील त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली नव्हती. तसेच प्रभागरचना करण्याचे आदेशदेखील निवडणूक आयोगाकडून दिले जात नव्हते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून बहुतांश निर्बंध शिथिल झाल्याने राज्य निवडणूक आयोग देखील तयारीला लागला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या आदेशानुसार आता शुक्रवारपासून प्रारूप प्रभागरचना करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यासाठी २०११ मधी जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी १४ लाख ८६ हजार इतकी लोकसंख्या होती. तोच निकष यंदा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ३१ प्रभाग चार सदस्यीय असल्याने १२२ नगरसेवक आहेत, मात्र आता १२२ प्रभाग असणार आहेत. आता चार सदस्यांऐवजी एकच प्रभाग सदस्यांची निवड करण्यात येईल. अर्थात ही प्रारूप प्रभागरचना असून, ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

इन्फो...

शुक्रवारी तातडीची बैठक आयुक्त जाधव

प्रभागरचना करण्याचे काम गोपनीय असते. त्यासाठी अभियंते आणि विभागीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार असून, त्यासाठी शुक्रवारी (दि.२७) सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. प्रभागरचना कधीपर्यंत सादर करायची याबाबत तूर्तास आदेश देण्यात आलेले नाहीत, मात्र लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

इन्फो...

ओबीसी आरक्षणाचा निर्णय राखीव

ओबीसी म्हणजेच अन्य मागासवर्गीयांचे आरक्षण अद्याप निश्चित नाही. प्रभागरचना झाल्यानंतर त्याबाबत राज्य निवडणूक आयोग न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे निर्णय घेणार आहे. दरम्यान, गेल्यावेळी २०११ मध्ये जनगणना झाल्यानंतर २०१२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तोच आधार घेण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनामुळे जनगणनाच होऊ न शकल्याने दहा वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येचे आधार घेण्यात येणार आहे.