शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

महापालिकेसाठी एक वाॅर्डातून एकच नगरसेवक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्षांनी तयारी आरंभली आहे. मात्र, ...

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्षांनी तयारी आरंभली आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य लाटदेखील निवडणुकीला अडसर ठरू शकते. त्यामुळे २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एक सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय झाल्यानंतरदेखील त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली नव्हती. तसेच प्रभागरचना करण्याचे आदेशदेखील निवडणूक आयोगाकडून दिले जात नव्हते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून बहुतांश निर्बंध शिथिल झाल्याने राज्य निवडणूक आयोग देखील तयारीला लागला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या आदेशानुसार आता शुक्रवारपासून प्रारूप प्रभागरचना करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यासाठी २०११ मधी जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी १४ लाख ८६ हजार इतकी लोकसंख्या होती. तोच निकष यंदा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ३१ प्रभाग चार सदस्यीय असल्याने १२२ नगरसेवक आहेत, मात्र आता १२२ प्रभाग असणार आहेत. आता चार सदस्यांऐवजी एकच प्रभाग सदस्यांची निवड करण्यात येईल. अर्थात ही प्रारूप प्रभागरचना असून, ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

इन्फो...

शुक्रवारी तातडीची बैठक आयुक्त जाधव

प्रभागरचना करण्याचे काम गोपनीय असते. त्यासाठी अभियंते आणि विभागीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार असून, त्यासाठी शुक्रवारी (दि.२७) सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. प्रभागरचना कधीपर्यंत सादर करायची याबाबत तूर्तास आदेश देण्यात आलेले नाहीत, मात्र लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

इन्फो...

ओबीसी आरक्षणाचा निर्णय राखीव

ओबीसी म्हणजेच अन्य मागासवर्गीयांचे आरक्षण अद्याप निश्चित नाही. प्रभागरचना झाल्यानंतर त्याबाबत राज्य निवडणूक आयोग न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे निर्णय घेणार आहे. दरम्यान, गेल्यावेळी २०११ मध्ये जनगणना झाल्यानंतर २०१२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तोच आधार घेण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनामुळे जनगणनाच होऊ न शकल्याने दहा वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येचे आधार घेण्यात येणार आहे.