शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

महापालिकेसाठी एक वाॅर्डातून एकच नगरसेवक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्षांनी तयारी आरंभली आहे. मात्र, ...

नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्षांनी तयारी आरंभली आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य लाटदेखील निवडणुकीला अडसर ठरू शकते. त्यामुळे २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एक सदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय झाल्यानंतरदेखील त्यावर पुढे काहीच कार्यवाही झालेली नव्हती. तसेच प्रभागरचना करण्याचे आदेशदेखील निवडणूक आयोगाकडून दिले जात नव्हते. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून बहुतांश निर्बंध शिथिल झाल्याने राज्य निवडणूक आयोग देखील तयारीला लागला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या आदेशानुसार आता शुक्रवारपासून प्रारूप प्रभागरचना करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यासाठी २०११ मधी जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या वेळी १४ लाख ८६ हजार इतकी लोकसंख्या होती. तोच निकष यंदा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ३१ प्रभाग चार सदस्यीय असल्याने १२२ नगरसेवक आहेत, मात्र आता १२२ प्रभाग असणार आहेत. आता चार सदस्यांऐवजी एकच प्रभाग सदस्यांची निवड करण्यात येईल. अर्थात ही प्रारूप प्रभागरचना असून, ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

इन्फो...

शुक्रवारी तातडीची बैठक आयुक्त जाधव

प्रभागरचना करण्याचे काम गोपनीय असते. त्यासाठी अभियंते आणि विभागीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार असून, त्यासाठी शुक्रवारी (दि.२७) सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. प्रभागरचना कधीपर्यंत सादर करायची याबाबत तूर्तास आदेश देण्यात आलेले नाहीत, मात्र लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

इन्फो...

ओबीसी आरक्षणाचा निर्णय राखीव

ओबीसी म्हणजेच अन्य मागासवर्गीयांचे आरक्षण अद्याप निश्चित नाही. प्रभागरचना झाल्यानंतर त्याबाबत राज्य निवडणूक आयोग न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे निर्णय घेणार आहे. दरम्यान, गेल्यावेळी २०११ मध्ये जनगणना झाल्यानंतर २०१२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तोच आधार घेण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनामुळे जनगणनाच होऊ न शकल्याने दहा वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येचे आधार घेण्यात येणार आहे.