शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नाशिक जिल्ह्यात मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

नाशिक : कोरोना संकटामुळे राज्य शासनाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अनुकरण करीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या जाणारी शालांत परीक्षा ...

नाशिक : कोरोना संकटामुळे राज्य शासनाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अनुकरण करीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या जाणारी शालांत परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुणदान करून दहावीचा निकाल शुक्रवारी (दि.१६) जाहीर केला. यात नाशिक जिल्ह्यातून परीक्षेला प्रविष्ट ९२ हजार २३६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४९ हजार ४२७ मुले (९९.९६ टक्के) व ४२ हजार ४८३ (९९.९७) मुलींचा समावेश असून, नेहमीप्रमाणे यावर्षीही उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्य माध्यमितक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचा नववीचा अंतिम निकाल व दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आल्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेले जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर २६ विद्यार्थ्यांचा निकाल तांत्रिक कारणाने राखून ठेवण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या गुणदान प्रक्रियेतील तांत्रिक उणिवांविषयी शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर त्याचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निकालानंतर कोणीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाच पावलाची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.

श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

विशेष प्रावीण्य- ३४,०१३

प्रथम श्रेणी- ४३,५५२

द्वितीय श्रेणी- १४,३१२

उत्तीर्ण श्रेणी- ३६३

इन्फो-

नाशिक जिल्ह्याचा असा राहिला निकाल

वर्ष - परीक्षा केंद्र - प्रविष्ट - उत्तीर्ण - प्रमाण

२०१७ - १८८ - ९१,१७९ - ७९,७१० - ८७.४२

२०१८ - १९५ - ९०,२३८ - ७९,८७२ - ८८.४७

२०१९ - १९६ - ९०,६५६ - ७१,४८७ - ७८.८६

२०२० - १९६ - ८९,०७८ - ८४,५५८ - ९४.९३

२०२१ - ०००- ९२,२३६ - ९२,२१० - ९९.९७

हिंदी प्रथम भाषेचा शंभर टक्के निकाल

नाशिक जिल्ह्याचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक लागला असून, विद्यार्थ्यांनी विषयनिहायही लक्ष्यवेधी गुण संपादित केले आहेत. यंदा हिंदी प्रथम विषयात सर्व शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर इंग्रजी प्रथम भाषा विषयात ९९.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सामाजिकशास्त्रमध्ये व मराठी द्वितीय, तृतीय ९९.९७, विज्ञान ९९.९६, उर्दू प्रथम भाषा ९९.९५, गणित ९९.९३, तर इंग्रजी द्वितीय व तृतीय, हिंदी द्वितीय व तृतीय, तसेच मराठी प्रथम भाषा विषयात ९९.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.