शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावात १५ दिवसांत ३० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST

नाशिक : स्वयंपाक घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तुंमधील कांद्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गत पंधरवड्यात कांदा तब्बल ...

नाशिक : स्वयंपाक घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तुंमधील कांद्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गत पंधरवड्यात कांदा तब्बल तीस रुपयांनी घसरला आहे. मात्र, खाद्यतेलाची भाववाढ सुरूच असून, स्वयंपाकाचा गॅसही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांच्या स्वयंपाकगृहाचे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाक गृहातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेल १६५ ते १७० रुपयांपर्यंत वाढले असून, सोयाबीन तेल १३४ ते १४० रुपयांपर्यंत पोहोचले. पामतेल १२५ ते १३० व शेंगदाणा तेल तब्बल १७५ रुपयांपर्यंत महागले आहे. डालडा तूप २५ रुपयांनी वाढून १२५ ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

--

शिमला तेजीत

बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले असले, तरी शिमला तेजीत आहे. भोपळ्याच्या भावात दोन ते तीन रुपयांचा चढउतार सुरू असून, कोबी स्थीर आहे. मेथीची घसरण अखेर थांबली असून, दहा रुपये प्रतिजुडीने मेथी तर कोथिंबीर सात ते आठ रुपये भाव घेत आहेत.

--

संत्री ९० रुपये किलो

कोरोना काळात विटामीन ‘सी’ मिळविण्यासाठी संत्रीला मागणी वाढली आहे. सध्या संत्री ९० ते १०० रुपयांनी विकली जात आहे. त्याचप्रमाणे, सफरचंद १८० ते २०० रुपये प्रतिकिलो भाव घेत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्राहकाकंडून फळांना मागणी वाढली आहे.

--

डाळींच्या भावातही तुरळक वाढ

डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे. डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे.

--

बाजारपेठेत निर्बंध लागू असल्याने ग्राहक मंदावले असून, वाढत्या महागाईमुळे ग्राहकांनी गरजेच्या तेल, मीठ मिरचीसह आ‌वश्यक डाळी गहू, तांदूळ खरेदीवर वस्तुंवर लक्ष केंद्रित केले आहे. सामन्य कुटुंबांच्या दरमाह किराणा माल मागणीतही घट झाली आहे.

- शेखर दशपूते, किराणा व्यापारी

--

बाजारपेठेत ग्राहक नसल्याने उन्हाळा सुरू होऊनही पालेभाज्या, फळभाज्यांना अपेक्षित दर मिळत नाही. कांदा घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खुल्या बाजारात ग्राहक कमी झाल्याने, सध्या कृषिमाल खेरेदी करणाऱ्या कंपन्यांना माल विकावा लागतो आहे.

- संपत जाधव,शेतकरी

--

खाद्यतेलासोबतच डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे वार्षिक वाळवणाचे वडे, पापड यांसारखे पदार्थ तयार करणे कठीण होऊन बसले आहे. वाढत्या महागाईचा थेट परिणाम स्वयंपाक घराच्या बजेटवर होतो आहे.

अश्विनी कदम, गृहिणी