शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावात १५ दिवसांत ३० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST

नाशिक : स्वयंपाक घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तुंमधील कांद्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गत पंधरवड्यात कांदा तब्बल ...

नाशिक : स्वयंपाक घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तुंमधील कांद्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गत पंधरवड्यात कांदा तब्बल तीस रुपयांनी घसरला आहे. मात्र, खाद्यतेलाची भाववाढ सुरूच असून, स्वयंपाकाचा गॅसही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांच्या स्वयंपाकगृहाचे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाक गृहातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेल १६५ ते १७० रुपयांपर्यंत वाढले असून, सोयाबीन तेल १३४ ते १४० रुपयांपर्यंत पोहोचले. पामतेल १२५ ते १३० व शेंगदाणा तेल तब्बल १७५ रुपयांपर्यंत महागले आहे. डालडा तूप २५ रुपयांनी वाढून १२५ ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

--

शिमला तेजीत

बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले असले, तरी शिमला तेजीत आहे. भोपळ्याच्या भावात दोन ते तीन रुपयांचा चढउतार सुरू असून, कोबी स्थीर आहे. मेथीची घसरण अखेर थांबली असून, दहा रुपये प्रतिजुडीने मेथी तर कोथिंबीर सात ते आठ रुपये भाव घेत आहेत.

--

संत्री ९० रुपये किलो

कोरोना काळात विटामीन ‘सी’ मिळविण्यासाठी संत्रीला मागणी वाढली आहे. सध्या संत्री ९० ते १०० रुपयांनी विकली जात आहे. त्याचप्रमाणे, सफरचंद १८० ते २०० रुपये प्रतिकिलो भाव घेत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्राहकाकंडून फळांना मागणी वाढली आहे.

--

डाळींच्या भावातही तुरळक वाढ

डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे. डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे.

--

बाजारपेठेत निर्बंध लागू असल्याने ग्राहक मंदावले असून, वाढत्या महागाईमुळे ग्राहकांनी गरजेच्या तेल, मीठ मिरचीसह आ‌वश्यक डाळी गहू, तांदूळ खरेदीवर वस्तुंवर लक्ष केंद्रित केले आहे. सामन्य कुटुंबांच्या दरमाह किराणा माल मागणीतही घट झाली आहे.

- शेखर दशपूते, किराणा व्यापारी

--

बाजारपेठेत ग्राहक नसल्याने उन्हाळा सुरू होऊनही पालेभाज्या, फळभाज्यांना अपेक्षित दर मिळत नाही. कांदा घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खुल्या बाजारात ग्राहक कमी झाल्याने, सध्या कृषिमाल खेरेदी करणाऱ्या कंपन्यांना माल विकावा लागतो आहे.

- संपत जाधव,शेतकरी

--

खाद्यतेलासोबतच डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे वार्षिक वाळवणाचे वडे, पापड यांसारखे पदार्थ तयार करणे कठीण होऊन बसले आहे. वाढत्या महागाईचा थेट परिणाम स्वयंपाक घराच्या बजेटवर होतो आहे.

अश्विनी कदम, गृहिणी