शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कांद्याच्या भावात १५ दिवसांत ३० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST

नाशिक : स्वयंपाक घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तुंमधील कांद्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गत पंधरवड्यात कांदा तब्बल ...

नाशिक : स्वयंपाक घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तुंमधील कांद्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गत पंधरवड्यात कांदा तब्बल तीस रुपयांनी घसरला आहे. मात्र, खाद्यतेलाची भाववाढ सुरूच असून, स्वयंपाकाचा गॅसही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांच्या स्वयंपाकगृहाचे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाक गृहातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेल १६५ ते १७० रुपयांपर्यंत वाढले असून, सोयाबीन तेल १३४ ते १४० रुपयांपर्यंत पोहोचले. पामतेल १२५ ते १३० व शेंगदाणा तेल तब्बल १७५ रुपयांपर्यंत महागले आहे. डालडा तूप २५ रुपयांनी वाढून १२५ ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

--

शिमला तेजीत

बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले असले, तरी शिमला तेजीत आहे. भोपळ्याच्या भावात दोन ते तीन रुपयांचा चढउतार सुरू असून, कोबी स्थीर आहे. मेथीची घसरण अखेर थांबली असून, दहा रुपये प्रतिजुडीने मेथी तर कोथिंबीर सात ते आठ रुपये भाव घेत आहेत.

--

संत्री ९० रुपये किलो

कोरोना काळात विटामीन ‘सी’ मिळविण्यासाठी संत्रीला मागणी वाढली आहे. सध्या संत्री ९० ते १०० रुपयांनी विकली जात आहे. त्याचप्रमाणे, सफरचंद १८० ते २०० रुपये प्रतिकिलो भाव घेत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्राहकाकंडून फळांना मागणी वाढली आहे.

--

डाळींच्या भावातही तुरळक वाढ

डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे. डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे.

--

बाजारपेठेत निर्बंध लागू असल्याने ग्राहक मंदावले असून, वाढत्या महागाईमुळे ग्राहकांनी गरजेच्या तेल, मीठ मिरचीसह आ‌वश्यक डाळी गहू, तांदूळ खरेदीवर वस्तुंवर लक्ष केंद्रित केले आहे. सामन्य कुटुंबांच्या दरमाह किराणा माल मागणीतही घट झाली आहे.

- शेखर दशपूते, किराणा व्यापारी

--

बाजारपेठेत ग्राहक नसल्याने उन्हाळा सुरू होऊनही पालेभाज्या, फळभाज्यांना अपेक्षित दर मिळत नाही. कांदा घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खुल्या बाजारात ग्राहक कमी झाल्याने, सध्या कृषिमाल खेरेदी करणाऱ्या कंपन्यांना माल विकावा लागतो आहे.

- संपत जाधव,शेतकरी

--

खाद्यतेलासोबतच डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे वार्षिक वाळवणाचे वडे, पापड यांसारखे पदार्थ तयार करणे कठीण होऊन बसले आहे. वाढत्या महागाईचा थेट परिणाम स्वयंपाक घराच्या बजेटवर होतो आहे.

अश्विनी कदम, गृहिणी