शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

ज्याने मन जिंकले, त्यानेच जग जिंकले

By admin | Updated: December 21, 2014 00:46 IST

ज्याने मन जिंकले, त्यानेच जग जिंकले

नाशिक : मानवी मन हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली असून, जो इतरांचे मन जिंकू शकतो तो जग जिंकू शकतो. त्यासाठी मनाचा गढूळपणा दूर करणे आवश्यक आहे. मन आणि शरीराचा प्रबळ संबंध असल्याने मन सुखी तरच शरीरही सुखी अशी स्थिती दिसून येते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. यशवंत पाटील यांनी केले. डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते ‘वेध मनाचा, शोध सुखाचा’ या विषयावर बोलत होते. या मंडळाचे ज्येष्ठ सभासद डी. एस. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, उपाध्यक्ष रघुनाथ पुरी आदि उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, प्रत्येक वयात मनाचा वेध, अवस्था ही वयानुसार बदलते. मात्र या बदलत्या वयात व परिस्थितीत मनावर संयम ठेवणे आवश्यक आहे. सकारात्मक भाव ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)