शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

नाशिक शहरात वन वे नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : शहरात काही भागात वाहतुकीच्या सोयीसाठी वन वे घोषित केले खरे; परंतु तेथे फलक लावूनदेखील वाहनचालकांकडून कोणतेही पालन ...

नाशिक : शहरात काही भागात वाहतुकीच्या सोयीसाठी वन वे घोषित केले खरे; परंतु तेथे फलक लावूनदेखील वाहनचालकांकडून कोणतेही पालन होत नाही. इतकेच नव्हे तर वन वे नसले तरी अनेक भागातून राँग साइडने जाण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक मार्गांवर रोजच वाहतूक कोंडी होत आहे.

शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. शहरातील वकीलवाडी, केटीएचएम कॉलेजसह अनेक भागात वाहतूक कोंडी होत आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाकादरम्यान स्मार्ट रोडचे काम सुरू असताना टिळकपथ सिग्नल ते रविवार कारंजा हा एकेरी मार्ग तात्पुरत्या स्वरूपात दुहेरी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता रस्ता सुरू होऊन वर्ष झाले तरी त्याचा दुहेरी मार्ग म्हणून सर्रास वापर सुरू आहे. धुमाळ चौक ते चांदीचा गणपती हादेखील दुहेरी मार्ग म्हणून वापरला जात आहे. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई पोलीस करीत नसल्याने वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात होत असतात. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही.

इन्फो...

केटीएचएम कॉलेजजवळ दररोजच गोंधळ

गंगापूररोडवर केटीएचएम कॉलेज परिसरात मोठे शैक्षणिक संकुल आहे. येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने केवळ प्रवेशव्दाराच्या समेारच छोटा उड्डाणपूल बांधला आहे. परंतु पंडित कॉलनीकडून जाणारे बहुतांश नागरिक या पुलाच्या खालून जाण्यासाठी राँग साइडने जातात. त्यातच याठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता अत्यंत अरुंद असून, तासन् तास वाहतूक कोंडी होते.

इन्फो...

वकीलवाडीत वाहतूक पोलीस गायब

वकीलवाडी येथे एम.जी. रोडकडून अशोक स्तंभाकडे जाण्यासाठी वन वे आहे; परंतु अशोक स्तंभाकडून किंवा रविवार कारंजाकडून शॉर्टकट घेऊन राँग साइडने येऊन एमजीरोडकडे वाहनचालक येतात. याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक आहे. परंतु प्रत्यक्षात कधीच कर्मचारी जागेवर नसतो.

इन्फो...

रविवारपेठेतील नियमभंग नित्याचाच

अशोकस्तंभ ते रविवार कारंजादरम्यान बाजारपेठा आणि घाऊक धान्य मार्केट आहेत. परंतु, त्यामुळे येथे वर्षानुवर्षे एकेरी मार्ग असतानाही रविवार कारंजा किंवा रविवार पेठेतून अनेकजण वन वे तोडून जातात. सायंकाळच्या वेळी अशाेकस्तंभ परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या घारपुरे घाटाकडे जाणारा रस्ता बंद आहे. अन्यथा या चौकात सायंकाळी जाणे कठीण होते.

इन्फो..

वन वे तोडणाऱ्यांकडून वर्षभरात चार लाख १४ हजार रुपयांचा दंड वसूल

वाहनचालकाने वन वे तोडला तर त्यावर वाहतूक पोलीस कारवाई करतात, अशी माहिती पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली. शहरातील विविध ठिकाणी वन वे तोडल्याने वाहतूक पोलिसांनी आत्तापर्यंत वन वे (नो एन्ट्री तोडल्याबद्दल गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर १० हजार ६११ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी दोन हजार ७३ वाहनचालकांकडून चार लाख १४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे, तर आठ हजार ५३८ लोकांकडून अद्याप दंड वसुली करणे बाकी आहे. अशाच प्रकारे वन वे तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र आता वाढत्या गरजेनुसार वन वेची फेररचना करण्यात आली आहे.