शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये सोमवारपासून शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:28 IST

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार ...

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार असून पाचवी ते आठवी व नववी ते बारावीच्या वर्गांंमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे कोणतेही बंधन नसून विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन अथवा शाळेचा पर्याय निवडू शकणार असल्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि कोरोनाचा ओसरता प्रभाव लक्षात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या. मात्र, शाळांमध्ये केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या तासिकांचे नियोजन करून याच विषयांचे शिक्षक उपस्थितीच्या सूचना होत्या. मात्र, आता सोमवार (दि.२२) पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत शंभर टक्के शिक्षकांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या प्रभावामुळे विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात येत असताना नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढत आहे. हीच गोष्ट विचारात घेऊन शिक्षण विभागाने सोमवारपासून शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी दिली आहे. यापूर्वी ४ जानेवारीपासून शहरासह जिल्हाभरात सुरू करण्यात आलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पाचवी ते आठवीच्या शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या असून विद्यार्थी व शिक्षक सुरक्षितता असल्याने शैक्षणिक वातावरण पूर्ववत करण्याच्या दिशेना जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत.

पॉईंटर-

जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०

नववी - १,११,४२१

दहावी - ९८,९५९

अकरावी - ६८,१६०

बारावी - ६७,९१८

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४

इन्फो-

पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेल्या शाळांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने सर्वच विषयांच्या तासिका सुरू करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पाचवी ते बारावीच्या सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळणार आहे.