शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शाळांमध्ये सोमवारपासून शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:28 IST

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार ...

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार असून पाचवी ते आठवी व नववी ते बारावीच्या वर्गांंमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे कोणतेही बंधन नसून विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन अथवा शाळेचा पर्याय निवडू शकणार असल्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि कोरोनाचा ओसरता प्रभाव लक्षात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या. मात्र, शाळांमध्ये केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या तासिकांचे नियोजन करून याच विषयांचे शिक्षक उपस्थितीच्या सूचना होत्या. मात्र, आता सोमवार (दि.२२) पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत शंभर टक्के शिक्षकांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या प्रभावामुळे विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात येत असताना नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढत आहे. हीच गोष्ट विचारात घेऊन शिक्षण विभागाने सोमवारपासून शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी दिली आहे. यापूर्वी ४ जानेवारीपासून शहरासह जिल्हाभरात सुरू करण्यात आलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पाचवी ते आठवीच्या शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या असून विद्यार्थी व शिक्षक सुरक्षितता असल्याने शैक्षणिक वातावरण पूर्ववत करण्याच्या दिशेना जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत.

पॉईंटर-

जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०

नववी - १,११,४२१

दहावी - ९८,९५९

अकरावी - ६८,१६०

बारावी - ६७,९१८

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४

इन्फो-

पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेल्या शाळांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने सर्वच विषयांच्या तासिका सुरू करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पाचवी ते बारावीच्या सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळणार आहे.