शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

शाळांमध्ये सोमवारपासून शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:28 IST

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार ...

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना सोमवारपासून शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात येणार असून पाचवी ते आठवी व नववी ते बारावीच्या वर्गांंमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थितीचे कोणतेही बंधन नसून विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन अथवा शाळेचा पर्याय निवडू शकणार असल्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी स्पष्ट केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि कोरोनाचा ओसरता प्रभाव लक्षात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू केल्या. मात्र, शाळांमध्ये केवळ गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या तासिकांचे नियोजन करून याच विषयांचे शिक्षक उपस्थितीच्या सूचना होत्या. मात्र, आता सोमवार (दि.२२) पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत शंभर टक्के शिक्षकांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये सर्व विषय शिकविले जाणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या प्रभावामुळे विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात येत असताना नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढत आहे. हीच गोष्ट विचारात घेऊन शिक्षण विभागाने सोमवारपासून शाळांमध्ये शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण उपसंचालक डॉ. नितीन उपासणी यांनी दिली आहे. यापूर्वी ४ जानेवारीपासून शहरासह जिल्हाभरात सुरू करण्यात आलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पाचवी ते आठवीच्या शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या असून विद्यार्थी व शिक्षक सुरक्षितता असल्याने शैक्षणिक वातावरण पूर्ववत करण्याच्या दिशेना जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत.

पॉईंटर-

जिल्ह्यातील विद्यार्थीसंख्या

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०

नववी - १,११,४२१

दहावी - ९८,९५९

अकरावी - ६८,१६०

बारावी - ६७,९१८

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४

इन्फो-

पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झालेल्या शाळांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने सर्वच विषयांच्या तासिका सुरू करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पाचवी ते बारावीच्या सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळणार आहे.