शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

अट मान्य झाल्यानंतर निश्चित झाला मुहूर्त!

By admin | Updated: February 3, 2016 22:10 IST

चिंचोली : विवाहासाठी शौचालय बांधकामाच्या मागणीचे धाडस

दत्ता दिघोळे जायगावमुला-मुलींची पसंती झाल्यानंतर रिवाजाप्रमाणे बोलणीचे सोपस्कार पूर्ण होतात. मुहूर्त ठरविण्यासाठी ब्रह्मवृंदाला पाचारण केले जाते. सोयीनुसार मुहूर्त ठरवत असतानाच अचानक मुलगी पुढे येते आणि आपली एक अट असल्याची विनंती करते. अट कोणती असेल, या विचाराने वधू-वर पक्षाचे पाहुणे एकमेकांकडे पाहतात. विवाह सोहळ्यापूर्वी वर पक्षाकडील मंडळींनी घरात शौचालय बांधावे, अशी अट मुलगी मोठ्या धाडसाने सांगते. त्यामुळे वातावण काहीसे गंभीर होते. मात्र वर पक्षातील मंडळींनी मुलीची अट मोठ्या मनाने आपल्याला मान्य असल्याचे सांगून आपण अट पूर्ण करण्यास तयार असल्याचे सांगताच उत्साहाने विवाह मुहूर्त निश्चित केला जातो. सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील घटनेमुळे मुलींच्या धाडसी मागणीचे कौतुक होत आहे. मुलीने वर पक्षाच्या नातेवाइकांना लग्नाची तारीख ठरवण्याआधी घरात शौचालय बांधा मगच लग्नाची तारीख धरा, अशी विनंती वजा अट टाकली. त्यामुळे होणारा संबंध जुळण्याआधी बिघडतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र वर पक्षातील मंडळींनी अतिशय समजूददारीची व मुलीची मागणी रास्त असल्याचे सांगत अशी मुलगी आपल्या घरची सून झाल्यास आनंद होईल असे सांगताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. घरात विवाहाची चर्चा सुरू असतानाच होणाऱ्या नववधूने घातलेल्या अटीचा विचार करता तिने दाखवलेल्या धाडसाचे व स्वत:बरोबरच समाजाला स्वच्छतेबाबत घालून दिलेल्या सामाजिक संदेशाचा विचार सर्वांना पटला. मुलीने घातलेली अट तीन दिवसांत पूर्ण केल्यानंतर लग्नाची तिथी निश्चित करण्यात आली. मुलाकडच्या नातेवाइकांनीही अट पूर्ण केल्यानंतर विवाहाचा २२ फेब्रुवारी हा मुहूर्त निश्ति केला. या विवाह सोहळ्याची त्यामुळे पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्र, सोशल मीडिया तसेच शाळांमध्ये विविध सामाजिक संस्था याबाबत जनजागृती करत आहे. त्यामुळे स्वच्छतेचा थेट मनावर परिणाम होतानाचे दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून चिंचोली येथील पोलीसपाटील मोहन सांगळे यांची कन्या मनीषा हिचे कौतुक होत आहे. गावातीलच शंकर नामदेव हुळहुळे या युवकाशी लग्नाची बोलणी सुरू असतानाच मनीषाला आपल्या होणाऱ्या सासरी शौचालय नसल्याचे कळताच तिथी निश्चित करण्याआधी अट पूर्ण करण्याची मागणी केली. शौचालय असेल तरच लग्न करणार, अशी सर्वांसमोर अट घालून सर्वांनाच शौचालयाचे महत्त्व मनीषाने पटवून दिले. शौचालयाची अट मान्य केल्यानंतर विवाह मुहूर्त निश्चित झाला. तो चर्चेचा विषय बनला आहे.