शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

सायखेड्याचा जुना पूल धोकादायक

By admin | Updated: May 9, 2017 01:25 IST

निफाड : सायखेडा येथील गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचा विषय अतिशय गंभीर झाला असून, हा पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : सायखेडा येथील गेल्या ५२ वर्षांपासून उभ्या असलेल्या गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचा विषय अतिशय गंभीर झाला असून, या पुलाचे ९ पैकी ३ गाळे हे चक्क तरंगत्या अवस्थेत असून, हा पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आला आहे. त्यामुळेच या पुलावरून जड वाहनांना मागील वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. परंतु सायखेडा पोलिसांच्या पूर्ण दुर्लक्षामुळे या पुलावरून राजरोस जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, मोठी दुर्घटना घडल्यास यास कोणाला जबाबदार धरायचे, असा खडा सवाल गोदाकाठच्या जनतेने विचारला आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाने साडेतीन कोटी मंजूर केले आहेत.विशेष म्हणजे, चांदोरी त्रिफुली येथे सायखेडा पुलावरून जड वाहनास बंदीचा फलकही लागलेला आहे. मात्र हा फलक ओलांडून जड वाहने या त्रिफुलीवरून प्रवेश करून पुलावरून निघून जातात. मग या वाहनांना सायखेडा पोलीस अडवत का नाही, त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, एवढी ढिलाई अचानक आली कशी, या पुलावरून बसेस जात नाहीत मग जड वाहनांना या पुलावरून परवानगी कशी, सायखेडा पोलिसांनी डोळ्यावर धृतराष्ट्रासारखी पट्टी बांधली आहे का, यासारखे असंख्य प्रश्न उभे राहत असून, यामुळे गोदावरी पट्ट्यातील गावांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी याप्रश्नी सायखेडा पोलिसांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.सायखेडा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर पूल बांधण्यास सन १९५८ साली प्रारंभ झाला आणि सन १९६५ साली या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. या पुलाची लांबी १५३ मीटर, तर रुंदी साडेसहा मीटर आहे. या पुलाला १६ मीटरचे एकूण नऊ गाळे आहेत. या पुलामुळे नाशिक, पिंपळगाव ब, निफाड, सिन्नर, संगमनेरकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. वर्षामागून वर्ष जात असताना, गोदावरीला सातत्याने पूर येत गेले. काळानुसार या पुलावरून तालुक्यातील वाहतूक वाढली. सिन्नर, शिर्डी, संगमनेर, पुणेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यात गोदावरीकिनारी असलेल्या २० ते २५ गावांत उसाचे क्षेत्र प्रचंड असल्याने उसाचे ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाळू, विटा, व इतर जड वाहनांची वाहतूक या पुलावरून वाढल्याने या पुलाची दमछाक होऊ लागली व त्यात गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा पडणारा प्रचंड दाब या सर्व कारणांमुळे हा पूल दिवसागणिक कमकुवत होऊ लागला. आता तर हा पूल मध्यभागी जास्त फुगलेला असून, दोन्ही टोकांना निमुळता आहे. या पुलाच्या जागी नवीन पूल व्हावा म्हणून तसा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला होता. सायखेडकर याप्रश्नी मंत्र्यांना भेटले होते. परंतु या ठिकाणी नवीन पूल बांधण्याकामी जागेच्या प्रचंड अडचणी येत असल्याची बाब सरकारदरबारी निदर्शनास आली आहे. त्यामुळे हा जुना पूल अत्यंत चांगल्या बांधणीने दुरुस्त करून त्यास नवीन रूप देणे हाच पर्याय उभा राहताना दिसत असून, या पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर झाले असून, पावसाळ्यापूर्वी या कामाला प्रारंभ झाल्यास या पुलाचा धोका टळू शकतो.