शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सायखेड्याचा जुना पूल धोकादायक

By admin | Updated: May 9, 2017 01:25 IST

निफाड : सायखेडा येथील गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचा विषय अतिशय गंभीर झाला असून, हा पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : सायखेडा येथील गेल्या ५२ वर्षांपासून उभ्या असलेल्या गोदावरी नदीवरील जुन्या पुलाचा विषय अतिशय गंभीर झाला असून, या पुलाचे ९ पैकी ३ गाळे हे चक्क तरंगत्या अवस्थेत असून, हा पूल पूर्णपणे धोकादायक स्थितीत आला आहे. त्यामुळेच या पुलावरून जड वाहनांना मागील वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. परंतु सायखेडा पोलिसांच्या पूर्ण दुर्लक्षामुळे या पुलावरून राजरोस जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, मोठी दुर्घटना घडल्यास यास कोणाला जबाबदार धरायचे, असा खडा सवाल गोदाकाठच्या जनतेने विचारला आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासनाने साडेतीन कोटी मंजूर केले आहेत.विशेष म्हणजे, चांदोरी त्रिफुली येथे सायखेडा पुलावरून जड वाहनास बंदीचा फलकही लागलेला आहे. मात्र हा फलक ओलांडून जड वाहने या त्रिफुलीवरून प्रवेश करून पुलावरून निघून जातात. मग या वाहनांना सायखेडा पोलीस अडवत का नाही, त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, एवढी ढिलाई अचानक आली कशी, या पुलावरून बसेस जात नाहीत मग जड वाहनांना या पुलावरून परवानगी कशी, सायखेडा पोलिसांनी डोळ्यावर धृतराष्ट्रासारखी पट्टी बांधली आहे का, यासारखे असंख्य प्रश्न उभे राहत असून, यामुळे गोदावरी पट्ट्यातील गावांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी याप्रश्नी सायखेडा पोलिसांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.सायखेडा गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर पूल बांधण्यास सन १९५८ साली प्रारंभ झाला आणि सन १९६५ साली या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. या पुलाची लांबी १५३ मीटर, तर रुंदी साडेसहा मीटर आहे. या पुलाला १६ मीटरचे एकूण नऊ गाळे आहेत. या पुलामुळे नाशिक, पिंपळगाव ब, निफाड, सिन्नर, संगमनेरकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. वर्षामागून वर्ष जात असताना, गोदावरीला सातत्याने पूर येत गेले. काळानुसार या पुलावरून तालुक्यातील वाहतूक वाढली. सिन्नर, शिर्डी, संगमनेर, पुणेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यात गोदावरीकिनारी असलेल्या २० ते २५ गावांत उसाचे क्षेत्र प्रचंड असल्याने उसाचे ट्रक, ट्रॅक्टर व इतर वाळू, विटा, व इतर जड वाहनांची वाहतूक या पुलावरून वाढल्याने या पुलाची दमछाक होऊ लागली व त्यात गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा पडणारा प्रचंड दाब या सर्व कारणांमुळे हा पूल दिवसागणिक कमकुवत होऊ लागला. आता तर हा पूल मध्यभागी जास्त फुगलेला असून, दोन्ही टोकांना निमुळता आहे. या पुलाच्या जागी नवीन पूल व्हावा म्हणून तसा प्रस्ताव सरकार दरबारी पाठवण्यात आला होता. सायखेडकर याप्रश्नी मंत्र्यांना भेटले होते. परंतु या ठिकाणी नवीन पूल बांधण्याकामी जागेच्या प्रचंड अडचणी येत असल्याची बाब सरकारदरबारी निदर्शनास आली आहे. त्यामुळे हा जुना पूल अत्यंत चांगल्या बांधणीने दुरुस्त करून त्यास नवीन रूप देणे हाच पर्याय उभा राहताना दिसत असून, या पुलाच्या दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी मंजूर झाले असून, पावसाळ्यापूर्वी या कामाला प्रारंभ झाल्यास या पुलाचा धोका टळू शकतो.