शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

जुन्यांनी फसविले; नव्यांना वेळ द्या

By admin | Updated: January 6, 2015 00:47 IST

धनगर समाज आरक्षण : मान्यवरांच्या प्रतिक्रया ; ६५ वर्षांत हाती काहीच नाही

नितीन काळेल - सातारा -धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, ही आमची ठाम भूमिका व मागणी आहे. त्यासाठी मागीलवर्षी आंदोलनही केले. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले. भाजपच्या नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. पंधरा दिवसांत आरक्षणाचा निर्णय होणार नाही. काँग्रेसने ६५ वर्षे काही न करता समाजाला फसविण्याचे काम केले, असा ठाम आरोप धनगर समाजातील मान्यवरांनी केला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत महाधिवक्त्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली आहे. या पर्श्वभूमीवर धनगर समाजातील काही मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजप व मित्रपक्षांच्या दोन्ही नवीन शासनाला थोडासा वेळ द्यावा लागेल, त्यांनी निर्णय न घेतल्यास पुढील भूमिका ठरवू, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘६५ वर्षांत काँग्रेसच्या शासनाने आम्हाला काही दिले नाही. बारामतीत उपोषण करूनही काही पदरी पडले नाही. केंद्रात व राज्यात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. हे सरकार आम्हाला नक्कीच आरक्षण देईल. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राजकारण करायचे आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मंत्री असतानाही या प्रश्नावर एकाच जातीची बाजू घेतली, हे दुर्दैव आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात काहीच अडचण नाही.’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष टी.आर. गारळे म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणाच्या निर्णयासंबंधी १५ दिवसांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत वाट पाहावी लागेल. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा ते सर्व आमची कृती समितीच ठरवेल.’ साताऱ्यातील अहिल्या सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मारुती जानकर यांनी आक्रमकतेवर भर देत सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा व आपला शब्द पाळावा. नाहीतर भाजपचीही राष्ट्रवादीसारखी स्थिती करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही.’ रयत शिक्षण संस्थेच आजीव सदस्य आनंदराव डोंबाळे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे ठामपणे सांगितले. ते म्हणाले, ‘आरक्षणाबाबत लवकर निर्णय न झाल्यास साखळी आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. आम्ही आरक्षणाच्या निकषात बसत आहे. त्यामुळे आरक्षण हे आम्हाला मिळायलाच हवे,’ असेही त्यांनी निक्षून सांगितले. (प्रतिनिधी)सर्व समाज एकत्र...धनगर समाजाला एनटीच्या सवलतीचा फायदा होत नाही. आम्ही अनुसूचित जमातीचे आरक्षण मागत आहोत. धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी समाजातील सर्व घटक व सर्व पोटाजाती एकत्र आल्या आहेत. राजकीय नेतेही एकत्र आले आहेत. त्यामुळे शासनाला आता आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवता येणार नाही, असेही मान्यवरांनी सांगितले.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत भांडणे लावण्याचे काम केले. धनगर समाजाला आरक्षण देणे हा राजकीय नाहीतर भावनिक मुद्दा आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुकूल भूमिका आहे.- महादेव जानकर, अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष