शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

अधिकाऱ्याच्या चुकीने सरपंचपद रिक्त

By admin | Updated: December 18, 2014 22:54 IST

काकडगाव : आदिवासी बांधवांमध्ये नाराजी

नामपूर : केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे काकडगावचे आदिवासी सरपंचपद रिक्त राहिले असून, यासंदर्भात संतप्त ग्रामस्थांनी तक्रारीचे निवेदन तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले आहे.निवडणूक आयोगाकडून सरपंचपद आदिवासी पुरुषाला राखीव होते. नियमाप्रमाणे वॉर्ड क्र. १ मधून या जागेसाठी गावकऱ्यांनी निंबा सोनवणे दाखल केला. स्थानिक स्वराज्य संस्था नियमाप्रमाणे शासनाने ५० टक्के महिला आरक्षण लागू केले आहे. याप्रमाणे काकडगावला ४ महिला ३ पुरुष सदस्य संख्या निवडणूक आयोगाने जाहीर केली. निवडणूक अधिकारी पंचायत कार्यालयात आल्यावर आदिवासी पुरुष सरपंचपदाबाबत माहिती विचारण्यासाठी गेल्यावर संबंधित अधिकारी एस. के. खरे यांनी गावचे सरपंचपद आदिवासी महिला प्रवर्गाला राखीव आहे. यामुळे पुरुषाला या जागेवर दावा करता येणार नाही, अशी माहिती दिली. यामुळे गावात एकच कल्होळ माजला, गावकऱ्यांनी विचारणा केली जर आमच्या गावात आदिवासी महिला सदस्य निवडूनच आली नाही तर सरपंचपदी फॉर्म भरायचा कोणाचा? यावर अधिकारी खरे यांची तारांबळ उडाली. गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजाराम अहिरे, उपसरपंच नंदलाल अहिरे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु तालुक्याचे तहसीलदार पोतदार आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या अटीवर गावकरी ठाम राहिले. ७ सदस्यांपैकी ५ महिलांचे आरक्षण हा गावावर अन्याय आहे, आदिवासी महिला सदस्यात या पदापासून वंचित राहावे लागणार आहे, आदिवासी महिला निवडणूनच आली नाही तर सरपंच कोण होणार या सर्व प्रकाराला निवडणूक निर्णय अधिकारी एस. के. खरे जबाबदार असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होवून गुन्हा दाखल करून कार्यमुक्त करावे असा ठराव गावाने केला आहे. यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या असून, गावातील सर्वच पुरुष, महिलांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)विशेष म्हणजे, सरपंच निवडणूक कामी जो अजेंडा दिला यावर तहसीलदारांच्या सह्या आहेत. यामुळे बागलाण तहसील कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक तलाठी, सर्कल यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सावळा गोंधळामुळे गावचे सरपंचपद रिक्त राहिले याचे दु:ख गावाला आहे. आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास सर्व आदिवासी बांधव तहसील कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा आदिवासी नेते आनंदा मोरे, विक्रम मोरे, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे यांनी दिला आहे.चौकट