शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्र्यांचे निमित्त झाले  अन् दोन विरोधक एकत्र आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 00:58 IST

एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून  दर्शवून दिले आहे. यास बनकर आणि कदम हे तरी अपवाद का ठरावेत? हे दोनही विरोधक एकत्र  आले, चर्चाही झाली. निमित्त होते... मुख्यमंत्री ठाकरे यांचे ओझर विमानतळावरील स्वागताचे!

ठळक मुद्देओझरला ठाकरे यांच्या स्वागतासाठी बनकर, कदम यांची उपस्थिती

ओझर : एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून  दर्शवून दिले आहे. यास बनकर आणि कदम हे तरी अपवाद का ठरावेत? हे दोनही विरोधक एकत्र  आले, चर्चाही झाली. निमित्त होते... मुख्यमंत्री ठाकरे यांचे ओझर विमानतळावरील स्वागताचे!शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी ओझर विमानतळावर काही काळ थांबले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी  आमदार दिलीप बनकर व माजी आमदार  अनिल कदम  उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी विमानतळावर असलेल्या एका कक्षात छोटेखानी बैठक घेतली.  वीजबिलांबाबत थकबाकी ७० हजार कोटींच्या वर गेली असल्याने त्यावर गंभीर चर्चा झाली. द्राक्षांबाबत केंद्राने सबसिडी बंद केल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, त्यावर ठाकरे यांनी याविषयी केंद्राकडे तातडीने शिफारस करणार असल्याचे सांगितले. कांद्याच्या भावाला लागलेली गळती बघता त्यावर तोडगा काढण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. कदम यांनी ओझर नगर परिषद व्हावी, यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न केले. त्याचाच दाखला देत मुख्यमंत्र्यांनी आता ओझर नगर परिषदेला रुरल मॉडेल सिटी बनवून दाखवा. त्यासाठी मी खंबीरपणे पाठीशी आहे, असे सांगितल्याने ओझरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, नसतील तरच नवल!सकारात्मक संदेशस्थानिक पातळीवर एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणारे कदम आणि बनकर हे दोन्हीही  सत्ताधारी गटाचे झाल्याने या दोघांचेही नेते राज्याचे प्रमुख आहेत. त्याचा प्रत्यय अनेकवेळा मुंबई-नाशकात आला असला तरी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दोघांना सोबत घेत वीज, कोविड, शेतमाल हमीभाव, कांदा, द्राक्षे संकट अशा विविध विषयांवर चर्चा केल्याने या एकत्रीकरणाचा सर्वत्र सकारात्मक संदेश जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Kadamअनिल कदम