शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

हृदयविकारात आदिवासी मुलांचे प्रमाण अधिक

By admin | Updated: April 30, 2015 00:01 IST

कुपोषणाचे बळी : वैद्यकीय उपचारांच्या जागृतीचाही अभाव

संकेत शुक्ल ल्ल नाशिकविकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर असणारे आदिवासी आणि त्यांची मुले केवळ कुपोषणाचेच बळी ठरतात असे नसून जनजागृतीचा अभाव आणि त्यामुळे आलेल्या अज्ञानामुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याचेही भान राहत नाही. परिणामी अनेक आजारांना बळी पडण्याचे प्रमाण आदिवासी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे उघड झाले आहे. आदिवासी भागात मुलांमध्ये असलेले कुपोषण हा नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरतो. त्यावर उपाययोजना म्हणून केवळ पौष्टिक खाद्य देऊन त्यांचा आरोग्यस्तर वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाच्या या प्रयत्नांत अंगणवाडी सेविकांचा सहभाग मोलाचा असला, तरी केवळ पौष्टिक खाद्य देऊन हा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुळात बालकांचा जन्म सुदृढ व्हावा यासाठी शहरात जितकी काळजी घेतली जाते तितकी ग्रामीण भागात आणि विशेषत: आदिवासी भागात घेतली जात नाही. त्यातच दारिद्र्य आणि दुष्काळ या दुहेरी संकटात सापडलेल्या बहुतांश आदिवासी समाजातील गरोदर स्त्रियांना पुरेसे पोषक अन्न न मिळाल्याचा परिणाम म्हणून आदिवासी भागातील बालके मोठ्या प्रमाणात विविध आजारांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. हृदयाला असलेल्या विविध आजारांसंदर्भात हृदयविकारतज्ज्ञ मनोज चोपडा यांनी आदिवासीबहुल ग्रामीण भागात केलेल्या पाहणीदरम्यान त्यांना ही गोष्ट आढळली आहे. मागील वर्षभरात त्यांनी नंदुरबार, तळोदा, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, हिंगोली, परभणी यांसह विविध ग्रामीण भागात केलेल्या पाहणीत हृदयाचा आजार असलेली सुमारे ३५० मुले सापडली. त्या मुलांमध्ये हृदयाच्या दोन कप्प्यांमधील छिद्र (ए.एस.डी.), हृदयाच्या दोन मोठ्या कप्प्यांमधील छिद्र (व्ही.एस.डी.), दोन महारोहिणीं-मधील छिद्र (पी.डी.ए.), डाव्या किंवा उजव्या बाजूची झडप बंद अशी अनेक मुले आढळली. त्या मुलांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटातील ७८ मुलांच्या हृदयाला छिद्र आढळले. त्या मुलांवर डॉ. चोपडा यांनी उपचार केले. आज ती मुले ठणठणीत आहेत. साधारणत: मुलांच्या विविध अवयवांची वाढ ही गर्भावस्थेतच होत असते. एक टक्का मुलांमध्ये पुरेशी वाढ न झाल्याने हा प्रश्न उद्भवतो. शहरापेक्षा ग्रामीण भागात आणि त्यातही आदिवासी कुटुंबांमध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्यांच्यातील दारिद्र्य आणि दुसरे म्हणजे अज्ञान. विविध औषधांच्या माध्यमातून बाळाचा विकास चांगला होऊ शकतो; परंतु त्याचे ज्ञान नसल्याने गर्भवती स्त्रियांना पौष्टिक अन्न आणि उपचार मिळत नाहीत. त्यामुळे गर्भाची वाढ अपरिपक्वरीत्या होते. आदिवासी समाजात असलेले अनेक समजही त्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळेच आदिवासी मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. ते टाळण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. - डॉ. मनोज चोपडा, हृदयविकारतज्ज्ञ