शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित अहवाल संख्या तब्बल दहा हजारांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

नाशिक : काेरोना बळींनी सातत्याने पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) पुन्हा ३१ रुग्णांचा मृत्यू ...

नाशिक : काेरोना बळींनी सातत्याने पाचव्या दिवशी तीसहून अधिक वाढ कायम ठेवली असून, रविवारी (दि.१२) पुन्हा ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,६८२ वर पोहोचली आहे, जिल्ह्यात एकूण ३७४१ रुग्ण नव्याने बाधित, तर ३७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात प्रथमच प्रलंबित अहवालांची संख्या दहा हजारांवर पोहोचली असल्याने आठवडाभर बाधितांचा आकडा मोठाच येण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी आणि प्रलंबित राहणारे अहवाल हा सध्याच्या चिंतेचा विषय आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १८४६, तर नाशिक ग्रामीणला १७९१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २८ व जिल्हाबाह्य ७६ रुग्ण बाधित आहेत, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०९, ग्रामीणला २१, तर जिल्हाबाह्य १ असा एकूण ३१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत दोन दिवसांपासून प्रलंबित अहवालांच्या संख्येने आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रलंबित संख्येची नोंद केली. शनिवारी ९६४१ प्रलंबित संख्येत अजून भर पडल्याने हा आकडा रविवारी १० हजार ८५१ वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रलंबित संख्येत सतत पडणारी भर चिंतेचा विषय ठरली आहे.

इन्फो

सर्वाधिक बळींची वाढ

मृतांच्या संख्येत गत पाच दिवसांपासून सातत्याने तीसहून अधिक बळींची भर पडली आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसात जिल्ह्यातील बळींच्या संख्येत १५०ने वाढ झाली आहे. बळींमधील ही वाढ आतापर्यंतच्या कोणत्याही एका आठवड्यातील सर्वाधिक वाढ आहे.

इन्फो

अहवालाची प्रतीक्षा चार दिवस

जिल्हा तसेच राज्य स्तरावरून मोठ्या प्रमाणात नमुने दाखल होत असल्याने एकूण बाधितांच्या अहवालांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गत आठवड्यापर्यंत अहवालासाठी असलेली दोन दिवसांची प्रतीक्षा आता जवळपास चार दिवसांवर जाऊन पोहोचली आहे.