शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आता पर्यायी शाहीमार्गालाही विरोध

By admin | Updated: January 8, 2015 00:42 IST

ग्रामउत्सव समिती : बैठक त्वरित बोलावण्याची केली मागणी

नाशिक : कुंभमेळ्यातील शाहीमार्गासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता गणेशवाडीतील पर्यायी शाहीमार्गाचा स्वीकार करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, दुसरीकडे मात्र या चर्चेमुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सिंहस्थ ग्रामउत्सव समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात तातडीने प्रशासनाने बैठक बोलवावी आणि त्यात ग्रामउत्सव समितीला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.गेल्या तीन कुंभमेळ्यापासून पंचवटीकरांनी सिंहस्थ ग्रामोदय समितीची स्थापना केली आहे. या समितीत पंचवटीतील सामजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विद्यमान खासदार या समितीचे अध्यक्ष असतात. त्या निकषाने सध्या खासदार हेमंत गोडसे हे अध्यक्ष आहेत. पंचवटी हे कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सेवाभावी वृत्तीने सामिल होऊन कार्यरत राहावे असे समितीचे धोरण आहे. परंतु शासन आणि प्रशासनाने तर महाउत्सवात पंचवटीकरांचा सहभागच नष्ट केला आहे. आता पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या उत्सवाच्या पद्धतीलाही बदलण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. शाही मिरवणुकीच्या मार्गातील बदल हा त्यातीलच एक भाग असल्याचे समितीने म्हटले आहे. पारंपरिक शाहीमार्गावर मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात गेलेला भाविकांचा बळी ही दुर्दैवी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी म्हणजेच शाहीमार्गात केलेले बदल बघता प्रशासनाने आपले अपयश मान्य केल्यासारखेच असल्याचे समितीचे म्हणणे आहे. परंतु पारंपरिक शाहीमार्गावर काही प्रमुख धार्मिक स्थळे, पौराणिक मंदिरे व साधू-महंतांचे आखाडे आहेत. त्यामुळे या मार्गाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साधू-महंतांच्या व समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक वर्षापूर्वी चर्चा झाली. त्यावेळी शाही मिरवणुकीचा मार्ग, शाहीस्नानाचे स्थान व कुंभमेळ्याच्या जागा यात कोणत्याही प्रकारे बदल केला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय कामांमध्ये समितीने कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र शाहीमार्गामध्ये बदल करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता व विरोध होत आहे. त्याकरिता प्रशासनाने कोणत्याही निर्णयाच्या अंतिम टप्प्यात जाण्याआधी समितीशी संवाद साधणे गरजेचे आहे. यासंबंधात समितीची बैठक पुढील सप्ताहात बोलावण्यात आली असून, त्यावेळी पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष भगवान भोगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)