शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आता पर्यायी शाहीमार्गालाही विरोध

By admin | Updated: January 8, 2015 00:42 IST

ग्रामउत्सव समिती : बैठक त्वरित बोलावण्याची केली मागणी

नाशिक : कुंभमेळ्यातील शाहीमार्गासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता गणेशवाडीतील पर्यायी शाहीमार्गाचा स्वीकार करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, दुसरीकडे मात्र या चर्चेमुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सिंहस्थ ग्रामउत्सव समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात तातडीने प्रशासनाने बैठक बोलवावी आणि त्यात ग्रामउत्सव समितीला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.गेल्या तीन कुंभमेळ्यापासून पंचवटीकरांनी सिंहस्थ ग्रामोदय समितीची स्थापना केली आहे. या समितीत पंचवटीतील सामजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विद्यमान खासदार या समितीचे अध्यक्ष असतात. त्या निकषाने सध्या खासदार हेमंत गोडसे हे अध्यक्ष आहेत. पंचवटी हे कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सेवाभावी वृत्तीने सामिल होऊन कार्यरत राहावे असे समितीचे धोरण आहे. परंतु शासन आणि प्रशासनाने तर महाउत्सवात पंचवटीकरांचा सहभागच नष्ट केला आहे. आता पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या उत्सवाच्या पद्धतीलाही बदलण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. शाही मिरवणुकीच्या मार्गातील बदल हा त्यातीलच एक भाग असल्याचे समितीने म्हटले आहे. पारंपरिक शाहीमार्गावर मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात गेलेला भाविकांचा बळी ही दुर्दैवी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी म्हणजेच शाहीमार्गात केलेले बदल बघता प्रशासनाने आपले अपयश मान्य केल्यासारखेच असल्याचे समितीचे म्हणणे आहे. परंतु पारंपरिक शाहीमार्गावर काही प्रमुख धार्मिक स्थळे, पौराणिक मंदिरे व साधू-महंतांचे आखाडे आहेत. त्यामुळे या मार्गाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साधू-महंतांच्या व समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक वर्षापूर्वी चर्चा झाली. त्यावेळी शाही मिरवणुकीचा मार्ग, शाहीस्नानाचे स्थान व कुंभमेळ्याच्या जागा यात कोणत्याही प्रकारे बदल केला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय कामांमध्ये समितीने कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र शाहीमार्गामध्ये बदल करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता व विरोध होत आहे. त्याकरिता प्रशासनाने कोणत्याही निर्णयाच्या अंतिम टप्प्यात जाण्याआधी समितीशी संवाद साधणे गरजेचे आहे. यासंबंधात समितीची बैठक पुढील सप्ताहात बोलावण्यात आली असून, त्यावेळी पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष भगवान भोगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)