शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

आता पर्यायी शाहीमार्गालाही विरोध

By admin | Updated: January 8, 2015 00:42 IST

ग्रामउत्सव समिती : बैठक त्वरित बोलावण्याची केली मागणी

नाशिक : कुंभमेळ्यातील शाहीमार्गासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता गणेशवाडीतील पर्यायी शाहीमार्गाचा स्वीकार करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, दुसरीकडे मात्र या चर्चेमुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सिंहस्थ ग्रामउत्सव समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात तातडीने प्रशासनाने बैठक बोलवावी आणि त्यात ग्रामउत्सव समितीला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.गेल्या तीन कुंभमेळ्यापासून पंचवटीकरांनी सिंहस्थ ग्रामोदय समितीची स्थापना केली आहे. या समितीत पंचवटीतील सामजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विद्यमान खासदार या समितीचे अध्यक्ष असतात. त्या निकषाने सध्या खासदार हेमंत गोडसे हे अध्यक्ष आहेत. पंचवटी हे कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सेवाभावी वृत्तीने सामिल होऊन कार्यरत राहावे असे समितीचे धोरण आहे. परंतु शासन आणि प्रशासनाने तर महाउत्सवात पंचवटीकरांचा सहभागच नष्ट केला आहे. आता पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या उत्सवाच्या पद्धतीलाही बदलण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. शाही मिरवणुकीच्या मार्गातील बदल हा त्यातीलच एक भाग असल्याचे समितीने म्हटले आहे. पारंपरिक शाहीमार्गावर मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात गेलेला भाविकांचा बळी ही दुर्दैवी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी म्हणजेच शाहीमार्गात केलेले बदल बघता प्रशासनाने आपले अपयश मान्य केल्यासारखेच असल्याचे समितीचे म्हणणे आहे. परंतु पारंपरिक शाहीमार्गावर काही प्रमुख धार्मिक स्थळे, पौराणिक मंदिरे व साधू-महंतांचे आखाडे आहेत. त्यामुळे या मार्गाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साधू-महंतांच्या व समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक वर्षापूर्वी चर्चा झाली. त्यावेळी शाही मिरवणुकीचा मार्ग, शाहीस्नानाचे स्थान व कुंभमेळ्याच्या जागा यात कोणत्याही प्रकारे बदल केला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय कामांमध्ये समितीने कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र शाहीमार्गामध्ये बदल करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता व विरोध होत आहे. त्याकरिता प्रशासनाने कोणत्याही निर्णयाच्या अंतिम टप्प्यात जाण्याआधी समितीशी संवाद साधणे गरजेचे आहे. यासंबंधात समितीची बैठक पुढील सप्ताहात बोलावण्यात आली असून, त्यावेळी पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष भगवान भोगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)