शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षेसाठी आता मर्यादित संधी, बंधनांविरोधात विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ...

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परीक्षा देण्याच्या संधींची कमाल मर्यादा आता निश्चित केली आहे. एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी)च्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील व मागास प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षेच्या संधी मर्यादीत केल्या आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गासह मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्येही तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

एमपीएससीच्या निर्णायानुसार, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एमपीसीएसीच्या परीक्षा देण्याच्या केवळ सहा संधी मिळणार आहे, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊ संधी मिळणार आहे. हा निर्णय २०२१च्या जाहिरातीपासून लागू होणार आहे. मात्र, त्यामुळे येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेतील खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची स्पर्धाच संपुष्टात येण्याची भीती स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदविला आहे.

कोट-१

एमपीएससीसीच्या स्पर्धा परीक्षांवरील निर्बंधांमुळे खु्ल्या प्रवर्गाचे स्पर्धा परीक्षेतील आव्हाण संपुष्टात येईल. एकीकडे खुल्या प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तर दुसरीकडे परीक्षांच्या संधीही मर्यादित करून खुल्या प्रवर्गावर अन्याय होत आहे.

रवींद्र बोराडे, उमेदवार

कोट-२

स्पर्धा परीक्षेच्या संधी कमी झाल्यामुळे खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. परीक्षेच्या संधी मर्यादितच करायच्या असतील, तर त्या सरसकट सर्वांसाठीच कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.

विलास जाधव, उमेदवार

कोट-३

संधी कमी करण्याचा निर्णय निषेधार्ह

प्रवर्गनिहाय आरक्षणातील असतोल हा बहुतांश उमेदवारांना मान्य असला, तरी निवडक विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या संधी कमी केल्याने संबंधित प्रवर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोणत्याही एका किंवा दोन प्रवर्गांच्या संधी कमी करण्याचा निर्णय निषेधार्ह आहे.

सागर ढेरिंगे, उमेदवार

कोट-४

एमपीएसीच्या संधी कमी झाल्याने खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मोठ्या नुकसान होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षा देणे शक्य होत नाही. त्यामुळे पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संधी कमी होऊ नये.

अमोल गायधनी, उमेदवार

इन्फो-

अशा प्रकारे संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास, ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.