शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

नाशकातील दोनशे उद्योजकांना नोटिसा

By admin | Updated: May 1, 2017 01:56 IST

भूखंड ताब्यात घेऊन विकासाविना अडवून ठेवणाऱ्या उद्योजकांवर औद्योगिक विकास महामंडळाने वक्रदृष्टी केली आहे.

नाशिक : ‘मेक इन नाशिक’चा नारा उद्योजक देत असले तरी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात भूखंडच उपलब्ध नसल्याने गुंतवणूक तरी कोठे करावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भूखंड ताब्यात घेऊन विकासाविना अडवून ठेवणाऱ्या उद्योजकांवर औद्योगिक विकास महामंडळाने वक्रदृष्टी केली आहे. नाशिकमधील दोनशे उद्योेजकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर ज्या उद्देशासाठी भूखंड घेतला तो उद्देश साध्य होत नसल्याने अनेक वेळा संधी देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या भूखंडधारकांचे भूखंड परत घेण्यासाठी ही कारवाई औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. नाशिक बरोबरच अहमदनगर येथील भूखंडधारकांवरही कारवाईचा बडगा उभारण्यात आला असून, दोन्ही मिळून ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीस भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उद्योजकांचे धाबे दणाणले आहे. उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून अनेक लोकांनी भूखंड घेतले आहेत. चार ते पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी अनेक भूखंडमालकांनी उद्योग सुरू केलाच नाही. अशा भूखंडधारकांना वेळोवेळी संधी देण्यात आली आहे. शिवाय अशा लोकांसाठी ‘उद्योग संजीवनी’ योजनादेखील आणली होती. तरीही अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. उलट उद्योग व्यवसायाच्या नावाखाली सवलतीच्या दरात भूखंड घेऊन चढ्या भावाने भूखंड विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्या उद्देशाने भूखंड घेतला तो उद्देश सफल होताना दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.औद्योगिक कारणांसाठी मिळविलेले भूखंड परत घेण्याची नोटीस अनेकदा देण्यात आलेली आहे. काही भूखंडधारकांनी नोटिसीनंतर मुदत मागवून घेत औद्योगिक वापर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा एकदा प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आल्यानंतर आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)