शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नामांकन छाननी प्रक्रिया शांततेत; १७ अर्ज अवैध

By admin | Updated: May 9, 2017 01:20 IST

ंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी दाखल झालेल्या ७८० नामांकन अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली

 लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महापालिकेच्या ८४ जागांसाठी दाखल झालेल्या ७८० नामांकन अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान छाननीची प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवारांनी सातही निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. काही नामांकन अर्जांवर हरकती नोंदविण्यात आल्यामुळे दीर्घकाळ निर्णयासाठी चर्चा करण्यात आली. सोमवारी झालेल्या छाननीप्रक्रियेत प्रभाग १ मधून चेतन आनंदा अहिरे यांनी दाखल केलेला अर्ज अवैध ठरविण्यात आला, तर प्रभाग २१ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अन्सारी एजाज अहमद फैय्याज अहमद यांना आठ अपत्ये असल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शेख जहीर जलानी यांनी प्रभाग २ ड मधून अर्ज दाखल केला होता, त्यांचाही नामांकन अर्ज अपत्यांमुळे अवैध ठरविण्यात आला. प्रभाग ११ मध्ये पुष्पा राजू पवार यांच्या अर्जावर अनुमोदक व सूचकाची स्वाक्षरी एकसारखीच असल्यामुळे अवैध ठरविण्यात आला, तर तीनपेक्षा अधिक अपत्ये असल्यामुळे १४ ब मधून अन्सारी नजमा अन्वर हुसेन, १९ ड मधून मुख्तार अहमद अहमद मकदूम यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. प्रभाग १९ ड मधून मोमीन अतीक मो. मुस्तफा यांनी प्रभागाबाहेरील सूचक व अनुमोदक दिल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शेख आबीद इस्माईल, प्रभाग ३ ब च्या शकीलाबानो शाहीद अहमद यांच्या अर्जावर अनुमोदक, सूचक नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग १८ क मधून भाजपाचे मुमताजबी शेखनूर, २० अ मधून अन्सारी अब्दुल अजीज नजीर अहमद, २० ब सारिकाबानो रहीम खान, एमआयएमचे २० क मधील शेख मुशरा माजीद, २० ड अन्सारी मो. याकुब नुरूलहुदा, शेख युसुफ चाँद, अन्सारी अब्दुल अजीज नजीर अहमद आदींचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. प्रभाग १ ब च्या उमेदवार वैशाली चव्हाण यांच्या नावात बदल झाल्याने हरकत नोंदविण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर सुनावणी घेत हरकत फेटाळून लावली, तर प्रभाग २ अ चे उमेदवार विठ्ठल बर्वे यांच्या अर्जावर तीन अपत्ये असल्याची हरकत नोंदविण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही हरकत फेटाळल्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. दुपारपर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू होती. कार्यालयाबाहेर उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत अर्ज छाननीप्रक्रियेचा अहवाल मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे येत होता.दरम्यान, काही अर्जांवर आज सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती नोंदविण्यात आल्या असल्यामुळे त्याचा अभ्यास करून निवडणूक निर्णय अधिकारी निकाल देणार आहेत.