शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वनहक्कासाठी नऊ हजार जणांची आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

नाशिक : वनहक्क कायद्यांतर्गत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले तर अशा आदिवासी ...

नाशिक : वनहक्क कायद्यांतर्गत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले तर अशा आदिवासी बांधवांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा अधिकार राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार मिळाला असल्याने जिल्ह्यात अशाप्रकारे सुमारे नऊ जणांनी आदिवासींनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

जमीन कसणाऱ्या आदिवासींना जमिनीचा हक्क देण्यासंदर्भात असलेल्या कायद्यानुसार दावे दाखल करण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात २००८ पासून ५२ हजार ५९० वैयक्तिक वनहक्क दावे दाखल झाले आहेत. त्यापैकी ३१ हजार ९५४ दावे मान्य झाले आहेत, तर २० हजार ३०९ दावे अनेक कारणांनी अमान्य करण्यात आले आहेत. याबाबतच्या पूर्ततेसाठी संधी देण्यात येऊनही कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने असे दावे अमान्य करण्यात आलेले आहेत. गेल्या महिन्यात २९ हजार ३९४ प्रकरणात सातबारा नोंदी झाल्या आहेत. १७११ नोंदी करण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे दावे फेटाळले गेले त्या २० हजार ३०९ पैकी विभागीय आयुक्तांकडे केवळ नऊ हजार जणांनी ते अपील केले आहे. दरम्यान, १९६ प्रकरणे आजही जिल्हास्तरीय समितीकडे व १७३१ दावे प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.

नव्या अधिसूचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय समित्या गठित करण्यात आल्या असून, सदर समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ घेण्याची संधी आदिवासींना मिळाली आहे. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना जमीन कसण्याचा हक्क मिळावा यासाठी करण्यात आलेल्या कायद्यानुसार जमीन कसणाऱ्या आदिवासींना निकषानुसार जमीन बहाल केली जाते. यासाठीचे पुरावे सादर करून त्यांना प्रकरणे दाखल करावी लागतात. परंतु वर्षानुवर्ष न्यायासाठी विलंब होत असल्याने अनेकदा आदिवासी बांधवांना आंदोलनात्मक भूमिकादेखील घ्यावी लागली आहे.

जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची सदर कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. आता त्यांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा अधिकार मिळाल्याने मोठ्या प्रमाणात दावे दाखल झालेले आहेत.