शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वनहक्कासाठी नऊ हजार जणांची आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

नाशिक : वनहक्क कायद्यांतर्गत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले तर अशा आदिवासी ...

नाशिक : वनहक्क कायद्यांतर्गत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले तर अशा आदिवासी बांधवांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा अधिकार राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार मिळाला असल्याने जिल्ह्यात अशाप्रकारे सुमारे नऊ जणांनी आदिवासींनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

जमीन कसणाऱ्या आदिवासींना जमिनीचा हक्क देण्यासंदर्भात असलेल्या कायद्यानुसार दावे दाखल करण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात २००८ पासून ५२ हजार ५९० वैयक्तिक वनहक्क दावे दाखल झाले आहेत. त्यापैकी ३१ हजार ९५४ दावे मान्य झाले आहेत, तर २० हजार ३०९ दावे अनेक कारणांनी अमान्य करण्यात आले आहेत. याबाबतच्या पूर्ततेसाठी संधी देण्यात येऊनही कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने असे दावे अमान्य करण्यात आलेले आहेत. गेल्या महिन्यात २९ हजार ३९४ प्रकरणात सातबारा नोंदी झाल्या आहेत. १७११ नोंदी करण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे दावे फेटाळले गेले त्या २० हजार ३०९ पैकी विभागीय आयुक्तांकडे केवळ नऊ हजार जणांनी ते अपील केले आहे. दरम्यान, १९६ प्रकरणे आजही जिल्हास्तरीय समितीकडे व १७३१ दावे प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.

नव्या अधिसूचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय समित्या गठित करण्यात आल्या असून, सदर समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ घेण्याची संधी आदिवासींना मिळाली आहे. वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना जमीन कसण्याचा हक्क मिळावा यासाठी करण्यात आलेल्या कायद्यानुसार जमीन कसणाऱ्या आदिवासींना निकषानुसार जमीन बहाल केली जाते. यासाठीचे पुरावे सादर करून त्यांना प्रकरणे दाखल करावी लागतात. परंतु वर्षानुवर्ष न्यायासाठी विलंब होत असल्याने अनेकदा आदिवासी बांधवांना आंदोलनात्मक भूमिकादेखील घ्यावी लागली आहे.

जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची सदर कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. आता त्यांना विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा अधिकार मिळाल्याने मोठ्या प्रमाणात दावे दाखल झालेले आहेत.