शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

मानोरीत नवीन उन्हाळ कांदा सडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 21:33 IST

मानोरी : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांची पाठ सोडण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिवसेंदिवस दिसून येत असून गत वर्षी साठवून ठेवलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याला कमी दराअभावी अनेक शेतकर्यांनी उकिरड्याचा, नांगरठीचा तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकून दिल्यानंतर चालू वर्षी देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवून ठेवलेला असून या साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची स्थिती दीड महिन्यातच बिकट झाली असून यंदाच्या वाढत्या उष्णता आणि दमट वातावरणामुळे कांदा चाळीतच सडण्यास सुरु वात झाली आहे.

ठळक मुद्देमानोरी : शेतकऱ्यांना दिलेले शेतमालाला हमी भावाचे आश्वासन पूर्ण होणार का?

मानोरी : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांची पाठ सोडण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिवसेंदिवस दिसून येत असून गत वर्षी साठवून ठेवलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याला कमी दराअभावी अनेक शेतकर्यांनी उकिरड्याचा, नांगरठीचा तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकून दिल्यानंतर चालू वर्षी देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवून ठेवलेला असून या साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची स्थिती दीड महिन्यातच बिकट झाली असून यंदाच्या वाढत्या उष्णता आणि दमट वातावरणामुळे कांदा चाळीतच सडण्यास सुरु वात झाली असून या कांद्याची सडण्याची स्थिती अतिशय बिकट झाली असून हातात पावडे घेऊन कांदा बाहेर काढण्याची वेळ येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी बाळासाहेब वावधाने यांच्यावर आली आहे.कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून विक्र मी उत्पादन घेत असून या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असून दोन वर्षांपासून खर्च फिटने देखील आवाक्याबाहेर झालेले आहे. आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात यंदा येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, जळगाव नेऊर आदी परिसरात कांद्याला भाव मिळेल अशी आशा न बाळगता तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता असताना देखील उन्हाळ कांद्याची विक्र मी लागवड केली होती. हजारो रु पये खर्चून पाण्याच्या कमतरतेमुळे कांदा बारीक राहिला होता.यंदा निवडणुकीची रणधुमाळी असल्याने नवीन उन्हाळ कांद्याला नक्कीच अच्छे दिन येणार अशी शेतकरी वर्गाला आशा लागून होती या पाशर््वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी आर्थिक उलाढाल करत उसनवारी करून का होईना नवीन कांदा चाळ तयार करून आपला कांदा साठवून ठेवला आहे.त्यात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचे स्त्रोत अल्पशा प्रमाणात असल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. मागील चार ते पाच मिहन्यापासून येवला तालुक्यात सरासरी तापमान ३५ अंश ते ४४ अंश दरम्यान राहिल्याने दमट वातावरण निर्माण झाल्याने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला मोकळी हवा न मिळाल्याने एक मिहन्यातच साठवून ठेवलेल्या कांद्याला उष्णतेचा परिणाम जानवल्याने कांदा सडण्यास सुरु वात झाली असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे मागील वर्षासारखी कांदा उत्पादक शेतकर्यांची दैनिय स्थिती निर्माण झाली असून सध्याचे उन्हाळ कांद्याचे दर सरासरी ७०० ते ८०० च्या दरम्यान असून या भावाने नवीन कांदा विकल्यास मागील वर्षासारखा खर्च देखील फिटणार नसल्याने अशीच उष्णता कायम राहिल्यास ज्या शेतकर्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक केली आहे त्या शेतकºयांच्या अडचणीत मोठी भर पडणार आहे. त्यात खरीप हंगाम तोंडावर आल्याने खरिपाच्या तयारी साठी भांडवल कसे उपलब्ध करायचे हा मोठा प्रश्न असून सध्या शेतकºयांची स्थिती म्हणजे इकडे आड अन तिकडे विहीर अशी गत निर्माण झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक अनेक दिग्गज उमेदवारांनी आपल्या प्रचार दौर्यात शेतकरी वर्गाला संबोधित करताना अनेक आश्वासने दिली असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास कांद्याच्या दराचा प्रश्न तसेच शेतकºयांच्या सर्व शेतमालाला हमी देण्याचे महत्त्वाचे आश्वासन दिले असून हे आश्वासन सत्यात उतरणार की नाही अशी चर्चा पुन्हा शेतकरी वर्गात सुरू झाली आहे.मागील एक मिहन्यापूर्वी मी बारा ट्रॅक्टर कांदा चाळीत साठवून ठेवला होता. खरीप हंगाम जवळ येऊ लागला असल्याने नवीन कांदे विकून भांडवल उपलब्ध करायचे असताना कांदे भरण्यासाठी चाळीत गेलो असता सडलेल्या कांद्याचा वास येऊ लागल्याने कांदा चाळ फोडून बघितली असता सुरु वातीलाच तीस क्विंटल च्या आसपास नवीन कांदा सडलेल्या अवस्थेत दिसून आला.- बाळासाहेब वावधाने, शेतकरी.