शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मानोरीत नवीन उन्हाळ कांदा सडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 21:33 IST

मानोरी : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांची पाठ सोडण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिवसेंदिवस दिसून येत असून गत वर्षी साठवून ठेवलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याला कमी दराअभावी अनेक शेतकर्यांनी उकिरड्याचा, नांगरठीचा तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकून दिल्यानंतर चालू वर्षी देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवून ठेवलेला असून या साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची स्थिती दीड महिन्यातच बिकट झाली असून यंदाच्या वाढत्या उष्णता आणि दमट वातावरणामुळे कांदा चाळीतच सडण्यास सुरु वात झाली आहे.

ठळक मुद्देमानोरी : शेतकऱ्यांना दिलेले शेतमालाला हमी भावाचे आश्वासन पूर्ण होणार का?

मानोरी : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांची पाठ सोडण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिवसेंदिवस दिसून येत असून गत वर्षी साठवून ठेवलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याला कमी दराअभावी अनेक शेतकर्यांनी उकिरड्याचा, नांगरठीचा तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकून दिल्यानंतर चालू वर्षी देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची साठवून ठेवलेला असून या साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची स्थिती दीड महिन्यातच बिकट झाली असून यंदाच्या वाढत्या उष्णता आणि दमट वातावरणामुळे कांदा चाळीतच सडण्यास सुरु वात झाली असून या कांद्याची सडण्याची स्थिती अतिशय बिकट झाली असून हातात पावडे घेऊन कांदा बाहेर काढण्याची वेळ येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी बाळासाहेब वावधाने यांच्यावर आली आहे.कांद्याचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून विक्र मी उत्पादन घेत असून या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत असून दोन वर्षांपासून खर्च फिटने देखील आवाक्याबाहेर झालेले आहे. आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात यंदा येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, जळगाव नेऊर आदी परिसरात कांद्याला भाव मिळेल अशी आशा न बाळगता तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता असताना देखील उन्हाळ कांद्याची विक्र मी लागवड केली होती. हजारो रु पये खर्चून पाण्याच्या कमतरतेमुळे कांदा बारीक राहिला होता.यंदा निवडणुकीची रणधुमाळी असल्याने नवीन उन्हाळ कांद्याला नक्कीच अच्छे दिन येणार अशी शेतकरी वर्गाला आशा लागून होती या पाशर््वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी आर्थिक उलाढाल करत उसनवारी करून का होईना नवीन कांदा चाळ तयार करून आपला कांदा साठवून ठेवला आहे.त्यात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने जमिनीतील पाण्याचे स्त्रोत अल्पशा प्रमाणात असल्याने उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. मागील चार ते पाच मिहन्यापासून येवला तालुक्यात सरासरी तापमान ३५ अंश ते ४४ अंश दरम्यान राहिल्याने दमट वातावरण निर्माण झाल्याने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला मोकळी हवा न मिळाल्याने एक मिहन्यातच साठवून ठेवलेल्या कांद्याला उष्णतेचा परिणाम जानवल्याने कांदा सडण्यास सुरु वात झाली असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे मागील वर्षासारखी कांदा उत्पादक शेतकर्यांची दैनिय स्थिती निर्माण झाली असून सध्याचे उन्हाळ कांद्याचे दर सरासरी ७०० ते ८०० च्या दरम्यान असून या भावाने नवीन कांदा विकल्यास मागील वर्षासारखा खर्च देखील फिटणार नसल्याने अशीच उष्णता कायम राहिल्यास ज्या शेतकर्यांनी उन्हाळ कांद्याची साठवणूक केली आहे त्या शेतकºयांच्या अडचणीत मोठी भर पडणार आहे. त्यात खरीप हंगाम तोंडावर आल्याने खरिपाच्या तयारी साठी भांडवल कसे उपलब्ध करायचे हा मोठा प्रश्न असून सध्या शेतकºयांची स्थिती म्हणजे इकडे आड अन तिकडे विहीर अशी गत निर्माण झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक अनेक दिग्गज उमेदवारांनी आपल्या प्रचार दौर्यात शेतकरी वर्गाला संबोधित करताना अनेक आश्वासने दिली असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास कांद्याच्या दराचा प्रश्न तसेच शेतकºयांच्या सर्व शेतमालाला हमी देण्याचे महत्त्वाचे आश्वासन दिले असून हे आश्वासन सत्यात उतरणार की नाही अशी चर्चा पुन्हा शेतकरी वर्गात सुरू झाली आहे.मागील एक मिहन्यापूर्वी मी बारा ट्रॅक्टर कांदा चाळीत साठवून ठेवला होता. खरीप हंगाम जवळ येऊ लागला असल्याने नवीन कांदे विकून भांडवल उपलब्ध करायचे असताना कांदे भरण्यासाठी चाळीत गेलो असता सडलेल्या कांद्याचा वास येऊ लागल्याने कांदा चाळ फोडून बघितली असता सुरु वातीलाच तीस क्विंटल च्या आसपास नवीन कांदा सडलेल्या अवस्थेत दिसून आला.- बाळासाहेब वावधाने, शेतकरी.