इगतपुरी : शहरापासून अवघ्या दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गालगत पिंप्रीसदो चौफुली फाटा ते भंडारदरावाडी कडे जाणाऱ्या सुमारे ५० किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रगती पथावर असुन या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील आदिवासींच्या जिवनात खऱ्या अर्थाने नवी पहाट उगवणार आहे. अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या विकासाचा मार्गच यामुळे खुला होणार आहे. सदरचा रस्ता भावली धरणाला वळसा घालुन जात असल्याने निसर्गाने नटलेला भावली धरण परिसर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही या रस्त्याचा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे इगतपुरीच्या पर्यटन विकासात आणखी एक भर पडली आहे.मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्या पासुन या रस्त्याच्या कामाला गेल्या सहा महिण्यांपासुन सुरु वात झाली असुन रस्त्याचे डांबरी करणाचे मोठे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असलेल्या याच रस्त्याच्या भागात सिमेंटकॉक्र ीटीकरणाचे काम सुरु केल्यामुळे रस्ता खराब होण्याचे प्रमाण देखील कमी होणार आहे. दरम्यान या रस्त्यामुळे पिंप्रीसदो, भावली डॅम, जामुंडे, गव्हांडे, कुरु ंगवाडी, आंबेवाडी वासळी आदी अनेक भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रहदारीमुळे फायदा होणार आहे.पिंप्रीसदो फाटा ते भडांरदरावाडी हा पूर्वी अतिदुर्गम भाग समजला जायचा त्यावेळी अनेक गोरगरीब आदिवासी बांधवांना येण्या-जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वैद्यकिय सेवा मिळविण्यासाठी व औषध उपचारा अभावी रु ग्ण दगावली जायची. मात्र आता रस्त्याच्या महामार्गामुळे या परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे (वार्ताहर)
आदिवासींच्या जीवनात उगवणार नवी पहाट
By admin | Updated: June 5, 2016 23:56 IST