शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

वृक्षलागवडीचे निव्वळ सोपस्कार

By admin | Updated: February 14, 2017 00:56 IST

संगोपनाकडे दुर्लक्ष : ठेकेदार मस्त, मनपा प्रशासन सुस्त; सारेच बेफिकीर

नाशिक : महापालिकेमार्फत शहरात २१ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुरू असून, सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चून मक्तेदारामार्फत सदर वृक्षलागवड केली जात असली तरी लागवडीचे निव्वळ सोपस्कार पार पाडले जात आहेत. अनेक ठिकाणी दहा फुटाच्यावर लावण्यात आलेले वृक्ष संगोपनाअभावी जळून गेले आहेत, तर असंख्य वृक्षांनी मान टाकली आहे. केवळ उद्दिष्ट पार पाडणे हाच उद्देश त्यातून स्पष्ट दिसून येत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत नागरीप्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या सुस्त कारभारावरही नागरिक तोंडसुख घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने शहरात २१ हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचा कार्यक्रम जन २०१५ मध्ये हाती घेतला होता. त्यासाठी कल्पतरू कन्स्ट्रक्शन, महारुद्र एंटरप्रायझेस, भाग्यश्री कन्स्ट्रक्शन, ज्योती सोसायटी, टेरेकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड या खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे. सदर एजन्सीला दहा फुटावरील वृक्षरोपांची लागवड करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, सदर वृक्षांची लागवड केल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी खासगी एजन्सीवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, खासगी एजन्सीमार्फत शहरातील सहाही विभागांमध्ये वृक्षलागवडीचे काम अद्यापही सुरू आहे. महापालिकेने वृक्ष लागवडीसाठी संबंधित एजन्सीला मनपाचे मोकळे भुखंड, सार्वजनिक ठिकाणे, नदी किनारे या स्वरूपातील जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, मक्तेदारांकडून वृक्ष लावले जात असले तरी त्याच्या संगोपनाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या असंख्य वृक्षांनी मान टाकून दिली आहे. वृक्षाचे धड संगोपन होत नसल्याने अनेक भागांत उभे वृक्ष जळून गेले आहेत. रस्त्यांच्या दुभाजकांमध्येही वृक्ष लावण्यात आले आहेत, परंतु त्यांचीही स्थिती गंभीर आहे. आता उन्हाळ्यात वृक्षरोपांना तगविण्यासाठी पाण्याची गरज भासणार आहे. परंतु केवळ वृक्ष लागवड करून मक्तेदार मोकळे झाले असून, त्याच्या संगोपनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे महापालिकेचे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट केवळ नावापुरताच राहणार असल्याचे चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गेल्या दीड-दोन वर्षांपासून महापालिकेमार्फत वृक्षलागवडीचा घोळ सुरू आहे. वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीनंतर महापालिकेला रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे वृक्ष हटविणे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)