शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निव्वळ नकारात्मकता कारणीभूत

By admin | Updated: May 18, 2014 00:06 IST

नाशिक : ‘जे पेरले तेच उगवते’ हेच आजवर सिद्ध होत आले आहे. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास त्याला उपरोक्त पंक्तीच पुरेशा आहेत.

 

नाशिक : ‘जे पेरले तेच उगवते’ हेच आजवर सिद्ध होत आले आहे. लोकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवाचे एका वाक्यात विश्लेषण करायचे झाल्यास त्याला उपरोक्त पंक्तीच पुरेशा आहेत. काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रिपद पाठोपाठ सलग पंधरा वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिमतीला असताना राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षावर भुजबळ यांची पकड असणे ओघाने आले. अशा वेळी पक्ष संघटनेचे पद असो वा शासन पातळीवरील लाभ असो, साहजिकच भुजबळ यांचा शब्द प्रमाणच ठरला व त्यातूनच राजी-नाराजीचे राजकारण तब्बल पंधरा वर्षे चालले हे नव्याने सांगणे नको. सत्ता-संपत्तीची धुंदी व दिमतीला हुजर्‍यांच्या फौजेमुळे बेपवाई व बेफिकिरी इतकी वाढीस लागली की, त्यातून स्वकीयांचे खच्चीकरणाचे राजकारणही खेळले गेले. त्यासाठी चेल्या- चपाट्यांना कधी त्यांच्या अंगावर सोडण्यात आले तर कधी याच चेल्या-चपाट्यांना अंगाखाली घेण्यात आले. अगदीच स्पष्ट भाषेत सांगायचे तर ज्या मराठा समाजावर आज आगपाखड केली जाते, त्या समाजाला डिवचण्यास सुरुवात कोठून झाली याचा विचार जरी केला तरी त्यातून सारे काही स्पष्ट व्हावे. जे जे विरोधक आहेत असे वाटू लागले, त्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न गेल्या पंधरा वर्षांच्या काळात करण्यात आले. त्यात मराठा, वंजारी आदि समाजाची नावे घेतली जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या सार्‍या गोष्टींचा हिशेब चुकता करण्याची तयारी अगदी निवडणूक जाहीर होण्यापूवीर् पासूनच मतदारांनी केली असेल तर त्यात दोष कोणाचा ? नाही म्हटले तरी, अगदीच नकारात्मका नको म्हणून मराठा समाजाला आमदारकी व वंजारी समाजाला म्हाडाचे सभापतिपद देऊन आपल्याविषयीची नाराजी घालविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न भुजबळ यांच्याकडून करण्यात आला, मात्र असे करताना पुन्हा एकवार राजी-नाराजी ओढवून घेण्यात आली. जातीय समीकरणांचा परिणाम राजकारणात व सत्ताकारणात आपलाच प्रभाव असावा यासाठी भुजबळ यांच्याकडून गेल्या पंधरा वर्षांत करण्यात आलेल्या प्रयत्नांतूनच जातीय समीकरणांचा पाया घातला गेला. त्यामुळे विशिष्ट समाजाचा त्यांच्याकडे विरोधक म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कायम राहिला. मात्र याच दरम्यान ज्या समाजाचे ते राष्टÑीय नेते बनू पाहात अशा समाजाप्रतीही त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यातून त्यांनीच जन्माला घातलेली समता परिषद या निवडणुकीपासून अगदीच अलिप्त राहिली, तर पक्षातही संघटनेवरील निष्ठेपेक्षा व्यक्तिगत निष्ठेलाच आजवर प्राधान्य देण्याची भूमिका राहिल्याने पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ताही भुजबळ यांच्यापासून दुरावला. पेरले तेच उगवले आजवरच्या राजकारणात भुजबळ यांनी जे जे डाव खेळले त्याचा हिशेब चुकता करणार्‍यांचीच संख्या अधिक आहे. एकेकाळी पक्ष संघटनेची धुरा ज्याच्या हाती सोपवून मांडीवर बसवले ते गजानन शेलार विरोधात गेले, तर मित्र पक्षाचे सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांच्याशी घेतलेला पंगाही त्यांना महाग पडला. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या मतदारसंघात कामे करण्यावरून निर्माण झालेला बेबनावही नाराजीचे कारण ठरले. चेल्या-चपाट्यांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे करण्यात आलेले राजकारण व त्यातून नाराज झालेल्यांनी आपला राग थेट भुजबळ यांच्यावरच काढला. त्यांचे समाजातील स्थान काय मराठा समाजाची नाराजी घालविण्यासाठी जयंत जाधव यांना आमदार म्हणून निवडून आणणे व वंजारी समाजाचे नरेंद्र दराडे यांची म्हाडावर नेमणूक करण्यात आली असली तरी, या जाधव व दराडे हे त्या त्या समाजाचे चेहरे व नेते नव्हेत हेदेखील लक्षात घेण्यात आले नाही.