शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘सुवर्ण रोखे’ योजनेला नगण्य प्रतिसाद

By admin | Updated: November 23, 2015 23:02 IST

अंदाज चुकला : पोस्टामधून पंधरा दिवसांत झाली जेमतेम २०० ग्रॅम बॉँण्ड्सची विक्री

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला उद्घाटन करण्यात आलेल्या ‘सार्वभौम सुवर्ण रोखे’ अर्थात गोल्ड मॉनिटायझेशन योजनेला नाशिकमधूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सोन्याच्या बाजारपेठेकडे वळलेल्या नागरिकांचा विचार करता टपाल खात्याच्या माध्यमातून सोन्याच्या बॉँडमध्ये गुंतवणूक वाढेल, हा सरकारचा अंदाज साफ चुकला असून, पंधरा दिवसांत जेमतेम दोनशे ग्रॅमच्या बॉँडमध्येच गुंतवणूक झाली आहे.केंद्र शासनाच्या योजनेकडे भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या बाजारातील पाऊल म्हणून बघितले जात होते. त्याचबरोबर सोन्याची आयात कमी व्हावी पर्यायाने सरकारच्या चालू खात्यावरील तूट कमी होऊन अर्थव्यवस्थेला गती यावी यासाठी सरकारने ही योजना आखली होती. या सरकारी योजनेचा लाभ सगळ्यांना घेता यावा यासाठी भारतीय टपाल कार्यालयात सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा मोठा गाजावाजा झाल्याने सरकारला मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा होती. परंतु नाशिक डाक विभाग अंतर्गत नाशिकमधील मुख्य टपाल कार्यालय आणि नाशिकरोड विभाग मिळून केवळ २०८ ग्रॅम सोनेच गुंतविण्यात आले असल्याची माहिती नाशिक जीपीओतर्फे सांगण्यात आली. प्रत्यक्ष सोने खरेदीऐवजी ‘पेपर बॉण्ड’ स्वरूपात हे सोने पोस्टामार्फत उपलब्ध करून देण्यात येत असले तरी आठ वर्षे कालावधीच्या या दीर्घकाळ योजनेचा लाभ घेण्यास नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना सहामाही २.७५ टक्के व्याज देण्यात येणार होते. केंद्र शासनाने दीर्घ विचार करून ही योजना आखली असली तरी सोन्याचे बदलते भाव आणि त्यामुळे मिळणारा तत्कालीक फायदा याचा विचार केला तर दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर नाही, असे अनेक जाणकारांचे मत आहे. त्यातच पेपर बॉँड स्वरूपात सोन्याची गुंतवणूक हा प्रकारही खूप रुजलेला नाही. जेव्हा हवे तेव्हा सोने खरेदी किंवा विक्री करता आले पाहिजे, या पारंपरिक विचारांचा पगडा असल्यानेच या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे गुंतवणूक क्षेत्रातील मान्यवरांनी सांगितले.अर्थात, गुंतवणूकदार थेट सरकारला दोषी धरत नाहीत. सरकारच्या योजनांची संकल्पना चांगली आहे. योजना अयशस्वी ठरली कारण यात संकल्पनेचा दोष नाही उलट ही योजना राबवताना सरकारने केलेल्या धाडसाचे कौतुक करायला हवे. ही योजना आणताना चुका घडल्या; परंतु त्यात दुरुस्ती करून अशी योजना वर्षभरात किमान तीन ते चार वेळेस राबविणे आवश्यक आहे. सोन्याच्या किमतीबाबत सरकारने जर योग्य धोरण स्वीकारले तर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल, असे मत नाशिकमधील गुंतवणूक सल्लागार प्रमोद पुराणिक यांनी व्यक्त केले.