शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

गरज सर्वंकष वाहतूक उपाययोजनांची

By admin | Updated: April 6, 2017 01:56 IST

नाशिक : वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात.

 नाशिक : शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या कॉलेजरोड आणि गंगापूररोडवरील वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली किंवा एखादा गंभीर अपघात घडला की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात. परंतु येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची गरज आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांसारख्या यंत्रणा या कितपत गांभीर्याने घेतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.कॉलेजरोड आणि गंगापूररोड हा उच्चभ्रू परिसर मानला गेला असला तरी येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या वाहतूक समस्यांना तोंड द्यावे लागते. या मार्गावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांमुळे भरधाव दुचाकी चालविणारे बाइकर्स तसेच कसरती करणारे स्टंट मॅन यामुळे येथे चालणे तसे धोकादायकच असते. आपण कितीही नियमानुसार वाहन चालवा, परंतु आपल्या पाठीमागून किंवा समोरून येणारे नियमांचे पालन करीत येईल याची खात्री नसते त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचे अनेक अपघात झाल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. पोलीस यंत्रणेकडून त्यावर उपाय करण्याचे दाखविण्यासाठी कधीतरी दुचाकी अडविण्यासारखे प्रकार घडतात. परंतु एक- दोन दिवसांच्या अशा कारवाईने तात्पुरती मलमपट्टी होते. गेल्यावर्षी अशाच प्रकारे एका प्राध्यापकाला अपघातामुळे जीव गमवावा लागल्यानंतर महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक वाहतुकीच्या बेशिस्तीविरोधात संयमाने पुढे सरकले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही.या मार्गांवर वाहनांसाठी पुरेशी जागा न सोडता बांधलेल्या इमारती आणि व्यापारी संकुले ही समस्या आहेच, परंतु त्यापलीकडे जाऊन रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे हीदेखील वाहतुकीला अडथळा ठरतात. फळविक्रेते, अंडारोल, पाणीपुरी यांसह अनेक विक्रेत्यांची अतिक्रमणे थाटली असून, ती हटविण्याची मात्र कोणतीही कारवाई महापालिका करीत नाही. गंगापूररोडवर किमान रस्ता रुंद आहेत. कॉलेजरोडवर मात्र तशी सोय नाही. दुभाजकांमुळे अगोदरच रस्ते अरुंद आहेत त्यातच दुतर्फा रस्ता रुंदीकरणाची सोय नाही. उलट दोन्ही बाजूच्या दुकाने, शोरूमचे वाहनतळ म्हणजे रस्तेच ठरले आहेत. विशेष म्हणजे अनेक शोरूमचे संचालक कॉलेजरोडच्या शोरूमसमोर प्रशस्त वाहनतळ अशी प्रसिद्धी करीत असतात. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई करणे हा उपाय नाही तर अशा इमारतींची वाहनतळे शोधून तेथे वाहने कशी उभी राहतील, याबाबत ठोस उपाययोजना झाली पाहिजे. दुकानांसमोरील दुकानदारांचीच अतिक्रमणे हटविण्याचे धाडस दाखवले पाहिजे. प्रसंगी वाहतूक मार्गातील बदलापासून अनेक उपाय करता येण्यासारखे आहेत, ते लोकांना विश्वासात घेऊन केले तर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल. (प्रतिनिधी)(समाप्त)