शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

गरज सर्वंकष वाहतूक उपाययोजनांची

By admin | Updated: April 6, 2017 01:56 IST

नाशिक : वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात.

 नाशिक : शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या कॉलेजरोड आणि गंगापूररोडवरील वाहतुकीच्या समस्यांविषयी ओरड झाली किंवा एखादा गंभीर अपघात घडला की, पोलीस धावपळ करीत दोन-तीन दिवस बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध मोहीम चालवितात. परंतु येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची गरज आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांसारख्या यंत्रणा या कितपत गांभीर्याने घेतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.कॉलेजरोड आणि गंगापूररोड हा उच्चभ्रू परिसर मानला गेला असला तरी येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या वाहतूक समस्यांना तोंड द्यावे लागते. या मार्गावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांमुळे भरधाव दुचाकी चालविणारे बाइकर्स तसेच कसरती करणारे स्टंट मॅन यामुळे येथे चालणे तसे धोकादायकच असते. आपण कितीही नियमानुसार वाहन चालवा, परंतु आपल्या पाठीमागून किंवा समोरून येणारे नियमांचे पालन करीत येईल याची खात्री नसते त्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्यांचे अनेक अपघात झाल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. पोलीस यंत्रणेकडून त्यावर उपाय करण्याचे दाखविण्यासाठी कधीतरी दुचाकी अडविण्यासारखे प्रकार घडतात. परंतु एक- दोन दिवसांच्या अशा कारवाईने तात्पुरती मलमपट्टी होते. गेल्यावर्षी अशाच प्रकारे एका प्राध्यापकाला अपघातामुळे जीव गमवावा लागल्यानंतर महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक वाहतुकीच्या बेशिस्तीविरोधात संयमाने पुढे सरकले होते. परंतु पुढे काहीच झाले नाही.या मार्गांवर वाहनांसाठी पुरेशी जागा न सोडता बांधलेल्या इमारती आणि व्यापारी संकुले ही समस्या आहेच, परंतु त्यापलीकडे जाऊन रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे हीदेखील वाहतुकीला अडथळा ठरतात. फळविक्रेते, अंडारोल, पाणीपुरी यांसह अनेक विक्रेत्यांची अतिक्रमणे थाटली असून, ती हटविण्याची मात्र कोणतीही कारवाई महापालिका करीत नाही. गंगापूररोडवर किमान रस्ता रुंद आहेत. कॉलेजरोडवर मात्र तशी सोय नाही. दुभाजकांमुळे अगोदरच रस्ते अरुंद आहेत त्यातच दुतर्फा रस्ता रुंदीकरणाची सोय नाही. उलट दोन्ही बाजूच्या दुकाने, शोरूमचे वाहनतळ म्हणजे रस्तेच ठरले आहेत. विशेष म्हणजे अनेक शोरूमचे संचालक कॉलेजरोडच्या शोरूमसमोर प्रशस्त वाहनतळ अशी प्रसिद्धी करीत असतात. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई करणे हा उपाय नाही तर अशा इमारतींची वाहनतळे शोधून तेथे वाहने कशी उभी राहतील, याबाबत ठोस उपाययोजना झाली पाहिजे. दुकानांसमोरील दुकानदारांचीच अतिक्रमणे हटविण्याचे धाडस दाखवले पाहिजे. प्रसंगी वाहतूक मार्गातील बदलापासून अनेक उपाय करता येण्यासारखे आहेत, ते लोकांना विश्वासात घेऊन केले तर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल. (प्रतिनिधी)(समाप्त)