शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी ‘नवचेतना’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST

नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात ...

नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजांसह मानसिक गरजांचीही पूर्तता होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठीच नाशिकच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन ‘नवचेतना’ या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून पाऊल पुढे टाकले आहे. अशा बालकांच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना पायावर उभे करण्याचा ध्यास ‘नवचेतना’च्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोविडच्या प्रकोपाने आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ज्या कुटुंबातील एकमेव कमावत्या किंवा कर्त्या व्यक्तीचे निधन झाले किंवा मातेचे निधन झाले, अशा कुटुंबातील बालकांचे शिक्षण पैशांअभावी खंडित होऊ शकते किंवा त्यांच्या शिक्षणात बाधा येऊ शकते. या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक हेमंत राठी, सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणारे प्राचार्य प्रशांत पाटील, ‘निमा’चे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांच्यासह काही अन्य मान्यवरांनी एकत्र येऊन अशा बालकांसाठी नवचेतना या नावाने मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला आहे. अनेक मुला-मुलींच्या आई किंवा वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले आहे. तसेच ज्यांचे शिक्षण खंडित होण्याने त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नवचेतनाच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आला आहे. पालक गमावलेला मुलगा किंवा मुलगी हे सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे राहायला हवे, त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण होईपर्यंत शिक्षणाकरिता मदत तसेच त्यांच्या योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणाकरिता येणारा अन्य खर्च, कौशल्य विकासासाठीचा खर्च त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत नवचेतनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच ज्या बालकांचे आई, वडील कोरोनाने हिरावले गेले आहेत, अशा बालकांना वात्सल्याचीही उणीव जाणवू नये, यासाठी समाजबांधवांचा त्यातील सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

-------

अशा आपत्तीच्या काळात ज्या बालकांचे आई किंवा वडील हिरावले गेले आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी समाजातून पुढाकार घेतला जावा, या उद्देशाने हे पाऊल उचचले आहे. त्यासाठी समाजातील अनेक मान्यवर, दानशूर व्यक्ती नक्कीच पुढे येऊन अशा विद्यार्थ्यांना आवश्यक आणि योग्य ती मदत करतील, हा विश्वास आहे. केवळ एक-दोन वर्ष नव्हे तर ती मुले पायावर उभी होईपर्यंत पुढील १५ वर्षे हा उपक्रम सुरु ठेवून अशा बालकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

- हेमंत राठी, उद्योजक