शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी ‘नवचेतना’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST

नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात ...

नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजांसह मानसिक गरजांचीही पूर्तता होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठीच नाशिकच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन ‘नवचेतना’ या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून पाऊल पुढे टाकले आहे. अशा बालकांच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना पायावर उभे करण्याचा ध्यास ‘नवचेतना’च्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोविडच्या प्रकोपाने आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ज्या कुटुंबातील एकमेव कमावत्या किंवा कर्त्या व्यक्तीचे निधन झाले किंवा मातेचे निधन झाले, अशा कुटुंबातील बालकांचे शिक्षण पैशांअभावी खंडित होऊ शकते किंवा त्यांच्या शिक्षणात बाधा येऊ शकते. या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक हेमंत राठी, सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणारे प्राचार्य प्रशांत पाटील, ‘निमा’चे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांच्यासह काही अन्य मान्यवरांनी एकत्र येऊन अशा बालकांसाठी नवचेतना या नावाने मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला आहे. अनेक मुला-मुलींच्या आई किंवा वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले आहे. तसेच ज्यांचे शिक्षण खंडित होण्याने त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नवचेतनाच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आला आहे. पालक गमावलेला मुलगा किंवा मुलगी हे सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे राहायला हवे, त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण होईपर्यंत शिक्षणाकरिता मदत तसेच त्यांच्या योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणाकरिता येणारा अन्य खर्च, कौशल्य विकासासाठीचा खर्च त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत नवचेतनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच ज्या बालकांचे आई, वडील कोरोनाने हिरावले गेले आहेत, अशा बालकांना वात्सल्याचीही उणीव जाणवू नये, यासाठी समाजबांधवांचा त्यातील सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

-------

अशा आपत्तीच्या काळात ज्या बालकांचे आई किंवा वडील हिरावले गेले आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी समाजातून पुढाकार घेतला जावा, या उद्देशाने हे पाऊल उचचले आहे. त्यासाठी समाजातील अनेक मान्यवर, दानशूर व्यक्ती नक्कीच पुढे येऊन अशा विद्यार्थ्यांना आवश्यक आणि योग्य ती मदत करतील, हा विश्वास आहे. केवळ एक-दोन वर्ष नव्हे तर ती मुले पायावर उभी होईपर्यंत पुढील १५ वर्षे हा उपक्रम सुरु ठेवून अशा बालकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

- हेमंत राठी, उद्योजक