शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी ‘नवचेतना’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:15 IST

नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात ...

नाशिक : गत वर्षभरात अनेक कुटुंबातील बालकांनी त्यांचे वडील, आई अशा कर्त्या व्यक्तींना गमावले आहे. अशा दुर्दैवी बालकांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजांसह मानसिक गरजांचीही पूर्तता होण्याची नितांत गरज आहे. त्यासाठीच नाशिकच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन ‘नवचेतना’ या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून पाऊल पुढे टाकले आहे. अशा बालकांच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना पायावर उभे करण्याचा ध्यास ‘नवचेतना’च्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोविडच्या प्रकोपाने आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ज्या कुटुंबातील एकमेव कमावत्या किंवा कर्त्या व्यक्तीचे निधन झाले किंवा मातेचे निधन झाले, अशा कुटुंबातील बालकांचे शिक्षण पैशांअभावी खंडित होऊ शकते किंवा त्यांच्या शिक्षणात बाधा येऊ शकते. या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक हेमंत राठी, सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणारे प्राचार्य प्रशांत पाटील, ‘निमा’चे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांच्यासह काही अन्य मान्यवरांनी एकत्र येऊन अशा बालकांसाठी नवचेतना या नावाने मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार केला आहे. अनेक मुला-मुलींच्या आई किंवा वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले आहे. तसेच ज्यांचे शिक्षण खंडित होण्याने त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नवचेतनाच्या माध्यमातून हा पुढाकार घेण्यात आला आहे. पालक गमावलेला मुलगा किंवा मुलगी हे सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे राहायला हवे, त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण होईपर्यंत शिक्षणाकरिता मदत तसेच त्यांच्या योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणाकरिता येणारा अन्य खर्च, कौशल्य विकासासाठीचा खर्च त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यापर्यंत नवचेतनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच ज्या बालकांचे आई, वडील कोरोनाने हिरावले गेले आहेत, अशा बालकांना वात्सल्याचीही उणीव जाणवू नये, यासाठी समाजबांधवांचा त्यातील सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

-------

अशा आपत्तीच्या काळात ज्या बालकांचे आई किंवा वडील हिरावले गेले आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी समाजातून पुढाकार घेतला जावा, या उद्देशाने हे पाऊल उचचले आहे. त्यासाठी समाजातील अनेक मान्यवर, दानशूर व्यक्ती नक्कीच पुढे येऊन अशा विद्यार्थ्यांना आवश्यक आणि योग्य ती मदत करतील, हा विश्वास आहे. केवळ एक-दोन वर्ष नव्हे तर ती मुले पायावर उभी होईपर्यंत पुढील १५ वर्षे हा उपक्रम सुरु ठेवून अशा बालकांमध्ये नवचेतना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

- हेमंत राठी, उद्योजक