शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

नाशिकच्या संरक्षणाला केंद्रीय सुरक्षा बलाचे ‘कडे’ ओढ्याला नवी प्रशिक्षण अकादमी : ६७ एकर जागेवर साकारणार प्रकल्प; १२५० सशस्त्र जवान राहणार तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:06 IST

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देऔद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम लष्कराप्रमाणे या दलाचा उपयोग

नाशिक : देशपातळीवर अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पेलण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने महाराष्टÑातील नाशिक व मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी दोन सुरक्षा तळे उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी केल्या जाणाºया जागेचा शोधही संपुष्टात आला आहे. नाशिकपासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेल्या ओढा-सय्यदपिंप्री या दोन्ही गावांच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागेवर लवकरच औद्योगिक सुरक्षा दलाच्या तळाचे काम केले जाणार आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नाशिक येथे तळ करण्यामागे अनेक कारणे देण्यात आली असून, त्यात प्रामुख्याने ओझर व आर्टिलरी सेंटरच्या गांधीनगर या दोन्ही विमानतळाच्या सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. याशिवाय नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेस, मध्यवर्ती कारागृह, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र, रेल्वेस्थानकाच्याही सुरक्षेचा आढावा मध्यंतरी घेण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने ते संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकमधील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच लगतच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत उद्भवलेल्या आपद्स्थितीचा सामना करण्यासाठीही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कामी येणार आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना, पूरस्थितीत बचाव व मदतकार्यासाठीही लष्कराप्रमाणे या दलाचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. नाशिकपासून जवळच त्यासाठी जागेची निश्चिती करण्यात आली असून, ओढा-सय्यदपिंप्री या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमेवर सुमारे ६७ एकर जागा ताब्यात घेण्यासाठी ३२ कोटी रुपयांचे शासकीय मूल्यही भरण्यात आले आहे. मध्यंतरी औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या जागेची पाहणी करून आपली पसंतीही प्रशासनाला कळविली आहे. या जागेवर संपूर्ण बटालियनच्या निवासाची, ट्रेनिंगची सुविधा उभारण्यात येणार असून, राज्यात कोठेही गरज पडल्यास या दलाची सहाय्यता घेण्यात येणार आहे.एकाचवेळी १२५० सशस्त्र जवानांची आवश्यकता भासेल त्याठिकाणी रवानगी करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.विमानतळ, आर्टिलरीची होणार सुरक्षाकेंद्रीय गृहमंत्रालयाने काही महिन्यांपूर्वीच देशातील महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने साधारणत: १२५० सशस्त्र जवानांचा समावेश असलेल्या दोन बटालियन कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी नाशिक व भोपाळ या दोन शहरांची निवड केली आहे.या सुरक्षा दलाचा उपयोग विमानतळ, सागरी पोर्ट, शासकीय महत्त्वाच्या इमारती, आर्टिलरी सेंटर, पुरातत्व खात्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी करण्याबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौºयाच्या सुरक्षेची जबाबदारीही देण्यात येणार असल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.