शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘भिलार’ला पोहोचली नाशिकची बोलकी पुस्तके

By admin | Updated: May 9, 2017 02:45 IST

नाशिक : ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख बनलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या गावात सुरू झालेल्या उपक्रमात नाशिकनेही खारीचा वाटा उचलला.

 धनंजय वाखारे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख बनलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या गावात सुरू झालेल्या उपक्रमात सारस्वतांचे गाव असलेल्या नाशिकनेही खारीचा वाटा उचलला असून, दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच ‘भिलार’च्या वाचकांना उपलब्ध झाला आहे. त्यासाठी नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. ज्या वाचकांची दृष्टी अधू झालेली आहे, वयोमानानुसार वाचन करणे अवघड बनले आहे किंवा ज्यांनी शाळेत जाऊन कधीही मुळाक्षरे गिरविली नाहीत अशा अनपढ वाचकांसाठी ही बोलकी पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. ब्रिटनमधील ‘हे आॅन वे’ या गावाच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मधोमध वसलेल्या ‘भिलार’ या गावाला ‘पुस्तकांचे गाव’ अशी ओळख लाभली आहे आणि या वाचन चळवळीमुळे ‘भिलार’ गाव जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचले आहे. ‘भिलार’मधील २५ घरांमध्ये छोटेखानी ग्रंथालये थाटलेली आहेत आणि त्यासाठी राज्य मराठी संस्थेच्या पुढाकारातून हजारो पुस्तके वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. पुस्तकांच्या गावाची चर्चा होत असताना त्याठिकाणी सारस्वतांचे गाव असलेल्या नाशिकने प्रतिसाद दिला नाही, असे अजिबात होणार नाही. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे आणि या उपक्रमाने देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत. पुस्तकांच्या गावाला पुस्तके तर लाखोने जातील, परंतु वाचनचळवळ सर्व घटकांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर यांनी अंध मुलांसाठी तयार केलेली बोलकी पुस्तके भिलारला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्य मराठी संस्थेच्याच सहाय्याने दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच भिलारला पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये ७५ मराठी व इतर हिंदी-इंग्रजी भाषेतील आहेत. भिलार गावातील अनेक ज्येष्ठ, वयोवृद्धांना पुस्तकांचे वाचन करणे शारीरिकदृष्ट्या शक्य होत नाही किंवा ज्यांनी कधीही शाळा शिकलेली नाही अशा लोकांना ही बोलकी पुस्तके शांतपणे बसून ऐकता येणार आहेत. आॅडिओ सीडीजच्या स्वरूपात तयार केलेली ही पुस्तके गावातील अंध वाचकांनाही उपयुक्त ठरणार आहेत. या बोलक्या पुस्तकांमध्ये पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रजांपासून अनेक नामवंत लेखकांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यात भविष्यात आणखी भर घातली जाणार आहे.