शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
4
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
5
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
6
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
7
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
8
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
9
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
10
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
11
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
12
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
13
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
14
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
15
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
16
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
17
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
18
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
19
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
20
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी

‘भिलार’ला पोहोचली नाशिकची बोलकी पुस्तके

By admin | Updated: May 9, 2017 02:45 IST

नाशिक : ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख बनलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या गावात सुरू झालेल्या उपक्रमात नाशिकनेही खारीचा वाटा उचलला.

 धनंजय वाखारे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख बनलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या गावात सुरू झालेल्या उपक्रमात सारस्वतांचे गाव असलेल्या नाशिकनेही खारीचा वाटा उचलला असून, दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच ‘भिलार’च्या वाचकांना उपलब्ध झाला आहे. त्यासाठी नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. ज्या वाचकांची दृष्टी अधू झालेली आहे, वयोमानानुसार वाचन करणे अवघड बनले आहे किंवा ज्यांनी शाळेत जाऊन कधीही मुळाक्षरे गिरविली नाहीत अशा अनपढ वाचकांसाठी ही बोलकी पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. ब्रिटनमधील ‘हे आॅन वे’ या गावाच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मधोमध वसलेल्या ‘भिलार’ या गावाला ‘पुस्तकांचे गाव’ अशी ओळख लाभली आहे आणि या वाचन चळवळीमुळे ‘भिलार’ गाव जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचले आहे. ‘भिलार’मधील २५ घरांमध्ये छोटेखानी ग्रंथालये थाटलेली आहेत आणि त्यासाठी राज्य मराठी संस्थेच्या पुढाकारातून हजारो पुस्तके वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. पुस्तकांच्या गावाची चर्चा होत असताना त्याठिकाणी सारस्वतांचे गाव असलेल्या नाशिकने प्रतिसाद दिला नाही, असे अजिबात होणार नाही. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे आणि या उपक्रमाने देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत. पुस्तकांच्या गावाला पुस्तके तर लाखोने जातील, परंतु वाचनचळवळ सर्व घटकांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नॅब डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर यांनी अंध मुलांसाठी तयार केलेली बोलकी पुस्तके भिलारला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्य मराठी संस्थेच्याच सहाय्याने दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच भिलारला पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये ७५ मराठी व इतर हिंदी-इंग्रजी भाषेतील आहेत. भिलार गावातील अनेक ज्येष्ठ, वयोवृद्धांना पुस्तकांचे वाचन करणे शारीरिकदृष्ट्या शक्य होत नाही किंवा ज्यांनी कधीही शाळा शिकलेली नाही अशा लोकांना ही बोलकी पुस्तके शांतपणे बसून ऐकता येणार आहेत. आॅडिओ सीडीजच्या स्वरूपात तयार केलेली ही पुस्तके गावातील अंध वाचकांनाही उपयुक्त ठरणार आहेत. या बोलक्या पुस्तकांमध्ये पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रजांपासून अनेक नामवंत लेखकांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यात भविष्यात आणखी भर घातली जाणार आहे.