शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा सध्यातरी ‘बर्ड फ्लू’मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST

नाशिक: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याबाबतचे संकेत मिळत असतांना नाशिक जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची एकही केस निदर्शनास ...

नाशिक: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याबाबतचे संकेत मिळत असतांना नाशिक जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची एकही केस निदर्शनास आली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या संदर्भात अफवा पसरली जात असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होत असल्याचे समेार आल्यानंतर राज्य शासनाकडून सर्वत्र खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संपर्क साधून बर्ड फ्लूच्या संदर्भात देण्यात आलेल्या निर्देशनाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या आनुषंगाने जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून तसेच जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्लू संदर्भात नागरिकांमध्ये अनेक प्रश्न असल्याने त्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील या व्यवसावर परिणाम झाल्याचे समोर आल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, आपल्या जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची एकही केस अद्यापपर्यंत निदर्शनास आलेली नाही. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे कोविड युद्धामध्ये उपयोगी ठरणाऱ्या प्रोटीनच्या आहारावर त्याचा परिणाम झाला आहे. आहारातील असा कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसून जोपर्यंत अधिकृत कोणतीही माहिती समोर येत नाही तोपर्यंत घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

बर्ड फ्लूच्या भीतीचा थेट परिणाम जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांवर झालेला आहे. त्यामुळे हा व्यवसायदेखील संकटात आल्याने या व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काहींनी केवळ अफवांमुळे आपल्या आहरात बदल केला. अशा अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना अधिकाधिक फटका बसत आहे. त्याचा परिणाम गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रामुख्याने दिसू लागला आहे.

--कोट--

अफवांवर विश्वास ठेवू नये--

जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कोणत्याही प्रकाराचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता आहार सुरू ठेवावा. काही काळजीचे कारण असल्यास तातडीन अधिकृत माहीत प्रसारित केली जाईल.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी