शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांच्या बंदमुळे नाशिक-१ डेपोचे घटले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:13 IST

नाशिक : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संपूर्ण बंद पुकारला जात असल्याने त्याचा परिणाम महामंडळाच्या बसेसवर झाला ...

नाशिक : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संपूर्ण बंद पुकारला जात असल्याने त्याचा परिणाम महामंडळाच्या बसेसवर झाला आहे. जिल्ह्यात महामंडळाचे १३ डेपो असून, सुमारे सातशे बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सेवा चालविली जाते. नाशिक शहरात नाशिक-१ आणि नाशिक-२ असे दोन आगार असून, लांब पल्ल्याच्या बसेस आगार क्रमांक १ मधून सोडल्या जातात.

कोरानाचे संक्रमण वाढत गेल्याने शहरात काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यानुसार शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बंद पुकारण्यात येत आहे. या बंदमुळे बाजारपेठा बंद आहेतच शिवाय नागरिकदेखील घराबाहेर पडत नसल्याने रस्ते ओस पडले आहेत. आठवडे बाजार केव्हाच बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सहाजिकच संपूर्ण बाजारपेठेवर परिणाम झाला असून, महामंडळावरदेखील प्रवासी संख्येचा परिणाम जाणवत आहे. अशी परिस्थिती जिल्ह्यातील सर्व आगारांची असून, केवळ नाशिक आगार क्रमांक १ चा विचार केला तरी त्यावरून जिल्ह्यातील बसआगारांचा अंदाज येतो.

नाशिक आगार-१

एकूण बसेस १६१

दोन दिवसांत धावलेल्या बसेस ७०

झालेल्या फेऱ्या : ८०

पैसे मिळाले दोन दिवसांत ५.५० लाख

--दोन दिवसांत लाखोंचे नुकसान--

नाशिक आगारातून पुणे, बोरीवली, औरंगाद, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात बसेस धावतात. गेल्या जानेवारीपासून महामंडळाच्या बसेस रुळावर येत असतांनाच जानेवारीपासून पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढल्याने नाशिक आगारातून धावणाऱ्या बसेसची संख्या ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. दररोज ५० ते ५५ हजार किकलोमीटर धावणाऱ्या बसेस अवघ्या २० हजार किलोमीटरपर्यंत येऊन थांबल्या आहेत.

शनिवार पेक्षाही रविवारी सर्वाधिक परिणाम झाल्याचे जाणवले. रविवार केवळ १० ते १२ हजार किलोमीटरच बसेस धावल्या. प्रवासी नसल्यामुळे झालेला परिणाम लॉकडाऊनच्या शक्यतेने अजूनही कमी झाला आहे.

---इन्फो--

अवघ्या २० ते २५ गाड्या

मागीलवर्षीच्या परिस्थितीतून सावरत नाशिक आगार-१ मधून किमान १३० बसेसचे ऑपरेशन सुरू होते. जानेवारीत चांगले उत्पन्न मिळत असतांनाच आता पुन्हा कोरोनाचा फटका बसला आहे. इतरवेळी फक्त ३५ ते ४० बसेस धावत आहेत, तर शनिवार, रविवारी हीच संख्या २४ ते ३० गाड्यांवर आली आहे.

--इन्फो--

सर्वच आगारांना बसला फटका

नाशिक विभागात नाशिक-१,मालेगाव, सटाणा, सिन्नर, मनमाड, कळवण, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, पेठ, पिंपळगाव, येवला, नाशिक-२ असे डेपो असून, या सर्वच डेपोंमधील दैनंदिन उत्पन्नात घट झालेली आहे. नियमित गाड्या बंद करण्याची वेळ आल्याने कर्मचाऱ्यांनादेखील काम नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक-१आगार त्यापैकीच एक असून, यावरून जिल्ह्यातील आगाराची परिस्थितीदेखील समोर येते.